शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात आरक्षित भूखंडावर २० मजली टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

ठाणे : रिक्षा स्टँडच्या आरक्षित भूखंडालगत असलेल्या भूखंडावर निवासी इमारती असतानाही तो भूखंड मोकळा दाखवून रहिवाशांना बेदखल करण्याचा ...

ठाणे : रिक्षा स्टँडच्या आरक्षित भूखंडालगत असलेल्या भूखंडावर निवासी इमारती असतानाही तो भूखंड मोकळा दाखवून रहिवाशांना बेदखल करण्याचा प्रयत्न करून त्याठिकाणी २० मजल्यांचा टॉवर उभारला जात असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक यासीन कुरेशी यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. विशेष म्हणजे यामध्ये स्वत: भरडलो गेल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातही मागील दोन वर्षांपासून याबाबत पुरावे सादर केल्यानंतरही महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने त्यांनी थेट आत्मदहनाचा इशाराच दिला.

मुंब्रा येथे कुरेशी हे त्याच भूखंडाच्या ठिकाणी मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु, तो मोकळा दाखवून या ठिकाणी विकासकाने २० मजल्यांचा टॉवर उभा केला आहे. या संदर्भात महासभेतदेखील विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ठिकाणी चर्चा झाली नाही. त्यामुळे मंगळवारी स्थायी समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी दालनाबाहेर ठिय्या मांडून जोपर्यंत माझ्या प्रश्नावर चर्चा होत नाही, तोपर्यंत हलणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर सभापती संजय भोईर यांनी त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर माघार घेऊन त्यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी या अनधिकृत बांधकामांबाबत अनेक पुरावे सभागृहात सादर केले. या ठिकाणी सीआरझेडचे उल्लघंन झाले असून, येथे रहिवासी वास्तव्यास असतानाहीदेखील किंबहुना मी स्वत: राहत असतानाही विकासकाने येथे मोकळा भूखंड दाखवून प्लॅन मंजूर करून घेतला. दोन वर्षांपासून याबाबत आवाज उठवूनही कारवाई होत नसल्याचा त्यांनी आरोप केला. शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनीही संबंधित विकासक ‘तू जा कुठेही, माझे कोणीही काही करू शकत नाही’, अशी धमकी देत असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्याचा बोलविता धनी कोण, असा याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर महापालिकेच्या शहर विकास विभागाने दोन दिवसात या संदर्भातील अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर करून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु दोन वर्षे चर्चा करूनही अजून वेळ कशासाठी, असा सवाल विक्रांत चव्हाण यांनी केला. याबाबत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही हा विषय थांबविणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अखेर सभापतींनी दोन दिवस अहवाल सादर केल्यानंतर पुढील स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत काय निर्णय घेतला, त्याची माहिती सभागृहाला द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर सभागृह शांत झाले.