शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कामातील दिरंगाई करणा-या ठेकेदारास २० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:11 IST

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला

- सुरेश लोखंडे 

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला नुकताच २० लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे कामचुकार ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.सततच्या वाढत्या वीजबिलाच्या रकमेतून मुक्त होण्यासाठी ठाणे मनपाने शिवाजी रुग्णालयासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा सुमारे तीन कोटी ९९ लाख ६० हजार रुपये खर्चाचा ठेका शारदा इन्व्हेन्शन कंपनीला दिला आहे. १३ फेब्रुवारी २००९ ला देण्यात आलेले हे काम सुमारे सहा महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. तसा करारही झालेला आहे. परंतु, हा सोलर प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. तो वेळेत पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंपनीला प्रतिदिन १० हजार रुपये दंड भरण्याची कारवाई झाली आहे.सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे गांभीर्य लक्षात न घेता ठेकेदार कंपनीने निष्काळजी केली. या प्रकल्पासाठी आणलेले महागडे साहित्य, यांत्रिक साहित्य, मशिनरी गंज खात असून सडत आहे. ठाणे महापालिकेनेदेखील त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते संजीव दत्त यांनी माहितीचा अधिकार टाकून ठाणे मनपाचे लक्ष वेधले. याशिवाय, करारानुसार कंपनीवर दंड आकारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावण्याची कारवाई महापालिकेला करावी लागली आहे. कराराप्रमाणे मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यात आला.सुमारे १९६० दिवस विलंब झाल्याची बाब दत्त यांनी निदर्शनात आणून दिल्यानंतर संबंधित कंपनीवर सुमारे २० लाखाचा दंड भरण्याची कारवाई केली आहे.ठाणेकरांच्या पैशांतून उभा करण्यात येत असलेला हा ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे कंपनीवर त्वरित कारवाई करावी. रेंगाळलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दत्त यांनी २०१२ पासून महापालिकेकडे तगादा लावला.त्यास दाद न देता कंपनीची पाठराखण करणाºया महापालिकेला अखेर कर्तव्याची जाणीव करून देऊन कंपनीकडून २० लाखांचा दंड वसूल करण्यास भाग पाडण्यात आले.संबंधित कंपनीच्या इसारा रक्कम, सुरक्षा अनामत आणि बँक गॅरंटी आदींच्या २४ लाख ४८ हजार ९०० रुपयांतून दंड २० लाख रुपये वसूल केल्याचे ठाणे मनपाचे कार्यकारी अभियंता विनोद गुप्ता यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे वेळेत काम न करणाºयांचे धाबे दणाणले आहे.