शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

विविध विकासकामांची २० कोटींची बिले थकीत; अंबरनाथ पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:12 IST

कोविडवर खर्च केल्याने निधीच शिल्लक नाही, प्रशासन झाले हतबल

अंबरनाथ :   अंबरनाथ नगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या कामांची बिले देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नाही. विकासकामांची २० कोटींची बिले थकली आहेत. सर्व निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च झाल्याने शहर विकासाच्या कामांची बिले देण्यासाठी निधी नसल्याने कंत्राटदारांनी कामे संथगतीने सुरू ठेवली आहेत. भविष्यातील कामांसाठीही निधी शिल्लक नसल्याने नवीन कामांना सुरुवात झालेली नाही. कोरोनामुळे पालिकेची आर्थिककोंडी झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिका सध्या आर्थिक कोंडीचा सामना करत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनावरील खर्च अफाट झाल्याने आता त्याचा थेट परिणाम हा पालिकेच्या कामकाजावर होत आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याने पालिकेने कोणताही विचार न करता कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे शहरातील इतर कामांच्या बाबतीत आता आर्थिककोंडी झाली आहे. सरकारकडून हवी तशी आर्थिक मदत कोरोनासाठी न झाल्याने पालिकेने सर्व विकासकामांचा निधी हा कोरोनावर खर्च केला. 

आता हा खर्च एवढा वाढला आहे की, पालिकेला आता त्यांच्याकडे आलेले बिल कसे द्यायचे, हा प्रश्न पडला आहे. बिलांसोबतच पालिकेच्या कर्मचा-यांसाठी येणारे सरकारी अनुदानही कमी झाल्याने त्या कर्मचा-यांच्या पगारामधील तफावत असलेली रक्कम कुठून आणावी, हा प्रश्न पडला आहे. तर, दुसरीकडे शहरातील काँक्रिट रस्त्यांसह इतर विकासकामांच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. या विकासकामांचे बिल देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नसल्याने कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी इतर विकासकामे संथगतीने सुरू ठेवली आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथ