शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

विविध विकासकामांची २० कोटींची बिले थकीत; अंबरनाथ पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:12 IST

कोविडवर खर्च केल्याने निधीच शिल्लक नाही, प्रशासन झाले हतबल

अंबरनाथ :   अंबरनाथ नगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या कामांची बिले देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नाही. विकासकामांची २० कोटींची बिले थकली आहेत. सर्व निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च झाल्याने शहर विकासाच्या कामांची बिले देण्यासाठी निधी नसल्याने कंत्राटदारांनी कामे संथगतीने सुरू ठेवली आहेत. भविष्यातील कामांसाठीही निधी शिल्लक नसल्याने नवीन कामांना सुरुवात झालेली नाही. कोरोनामुळे पालिकेची आर्थिककोंडी झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिका सध्या आर्थिक कोंडीचा सामना करत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनावरील खर्च अफाट झाल्याने आता त्याचा थेट परिणाम हा पालिकेच्या कामकाजावर होत आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याने पालिकेने कोणताही विचार न करता कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे शहरातील इतर कामांच्या बाबतीत आता आर्थिककोंडी झाली आहे. सरकारकडून हवी तशी आर्थिक मदत कोरोनासाठी न झाल्याने पालिकेने सर्व विकासकामांचा निधी हा कोरोनावर खर्च केला. 

आता हा खर्च एवढा वाढला आहे की, पालिकेला आता त्यांच्याकडे आलेले बिल कसे द्यायचे, हा प्रश्न पडला आहे. बिलांसोबतच पालिकेच्या कर्मचा-यांसाठी येणारे सरकारी अनुदानही कमी झाल्याने त्या कर्मचा-यांच्या पगारामधील तफावत असलेली रक्कम कुठून आणावी, हा प्रश्न पडला आहे. तर, दुसरीकडे शहरातील काँक्रिट रस्त्यांसह इतर विकासकामांच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. या विकासकामांचे बिल देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नसल्याने कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी इतर विकासकामे संथगतीने सुरू ठेवली आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथ