शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

३४ कोटींची नुकसानभरपाई; ७७ हजार शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:33 IST

नुकसानीच्या तुलनेत भरपाई कमी असल्याने बळीराजा नाराज

- सुरेश लोखंडेठाणे : अवेळी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतातील मालाचे नुकसान झाले असून, त्यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे ही भरपाई देण्याचा निर्णय सध्याच्या राष्ट्रपती राजवटीतील प्रशासनाने घेतला. या नुकसानभरपाईचा लाभ जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, ही भरपाई फारच कमी असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून उमटत आहे.‘शेतकरी २९ कोटींच्या भरपाईच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली लोकमतने १५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून शेतकºयांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने जिल्ह्यातील ७७ हजार शेतकºयांच्या ४२ हजार ४२६ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांचा निकष निश्चित केला होता. त्यानुसार, २८ कोटी ८४ लाख ९९ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत कृषी विभागाने शासनास दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकºयांना ३३ कोटी ९४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भरपाईची रक्कम महसूल विभागाद्वारे वाटप होणार की, थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार, याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर केले. मात्र, भरपाई लागू करण्याचा निर्णय गुलदस्त्यात होता. राष्टÑपती राजवटीमुळे यास विलंब होत असल्याने शेतकºयांमध्ये संताप होता. अखेर, शनिवारी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाईच्या जुन्या अध्यादेशात एक हजार २०० रुपयांची वाढ करून हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांना भरपाई लागू झाली आहे. या नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही. कदाचित, सोमवारपर्यंत त्या येतील. जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टरवरील पंचनामे झालेले आहे. भरपाईची रक्कम बँकेत जमा होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली.हेक्टरी २०/२५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन भरीव नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील भातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये शेतकºयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजार आणि वरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.सर्वाधिक भरपाई भिवंडी तालुक्यालाभिवंडी तालुक्यातील सर्वाधिक १९ हजार ४५० शेतकºयांचे नुकसान झाले. त्यांच्या १५ हजार ६८० हेक्टरवरील पिकास १२ कोटी ५४ लाख ४० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. शहापूर तालुक्यातील ११ हजार ७७६.६७ हेक्टरवरील नुकसान झालेल्या २४ हजार १९० शेतकºयांना नऊ कोटी ४२ लाख १३ हजार रुपये, तर मुरबाड तालुक्यातील १८ हजार ७२६ शेतकºयांना १० हजार २४९ हेक्टरवरील पिकांसाठी आठ कोटी १९ लाख ९२ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणे शक्य आहे. कल्याण तालुक्यातील सात हजार ६५ शेतकºयांना एक हजार ५७९ हेक्टरच्या नुकसानीपोटी एक कोटी २६ लाख ३२ हजार रुपये, तर अंबरनाथ तालुक्यातील सात हजार शेतकºयांना दोन हजार ९५० हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपये आणि ठाणे तालुक्यामधील ६९७ शेतकºयांना १९१.६० हेक्टरकरिता १५ लाख ३२ हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.