शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सव, गावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 16:12 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात आंबा आणि आंब्याच्या पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सवगावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार  १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार

ठाणे : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव गावदेवी मैदान येथे १ मेपासून सुरू होत आहे. यंदाचे या महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.    १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. १ मे रोजी सायं. ४.३० वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील बागायतदारांचे सेंद्रीय पद्धतीचे आंबे या महोत्सवात असणार आहे. आंबे व आंब्यांचे इतर पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. यात कृषी विद्यापीठाचा वेगळा स्टॉल देखील असणार आहे. कोकणताली आंबा उत्पादक शेतकरी वेळोवेळी अडचणीत असतो. परंतू हा शेतकरी सर्व संकटावर मात करुन आंब्याची शेती करतो, या वर्षी ४० टक्के आंब्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. या महोत्सवात २ व ३ मे रोजी मृणाल कुलकर्णी आणि निमिर्ती सावंत भेट देणार आहेत. कोकणातील १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड होते. २०१५ साली ३ लाख २० हजार मेट्रीक टन, २०१६ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन तर २०१७ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन उत्पन्न झाले अशी खंत व्यक्त करत आंबा उत्पादन घटतंय याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी या महोत्सवात एक कोटीच्यावर उलाढाल झाली होती. २०१६ ला हाच आकडा दीड कोटी होता असे आ. केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMangoआंबाMarketबाजार