शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

१९५३ गावांत आज सातबारा होणार आॅनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:16 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे.

सुरेश लोखंडेठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे. या गावांपैकी अंबरनाथ तालुक्यातील बांदणवाडीतील शेतक-यांचे १०० टक्के डिजिटल सातबारा आॅनलाइन झाला असून त्यांच्या वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी होत आहे.

जिल्हाभरात सुमारे एक लाख ७० हजार ६५६ खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एक हेक्टरपर्यंतच्या अत्यल्प भूधारक शेतकºयांपासून ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक, चार हेक्टरपर्यंतचे लघु, मध्यम, मध्यम भूधारक १० हेक्टरपर्यंत आणि मोठे शेतकरी १० हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकºयांचा जिल्ह्यात समावेश आहे. जिल्हाभरातील एक हजार ९५३ गावांमधील शेतजमिनींचे सातबारा आॅनलाइन डिजिटल करण्याचे काम काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.

सद्य:स्थितीला १०० टक्के डिजिटल सातबारा अंबरनाथच्या बांदणवाडी या महसुली गावातील शेतजमिनीचे तयार झाल्याची माहिती या योजनेचे काम हाताळणारे उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. या आॅनलाइन डिजिटल मोडच्या दृष्टीने एक हजार ९५३ महसुली गावांपैकी आतापर्यंत ८९८ गावांतील शेतजमिनीच्या डिजिटल सातबा-यांसाठी घोषणा प्रपत्र-३ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एक हजार ५५ गावांचे काम अर्धवट शिल्लक असल्याच्या वृत्तास वळवी यांनी दुजोरा दिला आहे. या योजनेच्या सातबारा वितरणास शुभारंभ होत असला, तरी १०० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.राज्यभर डिजिटल स्वाक्षरीनिशी सातबारा उपलब्ध होत असल्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांचा सातबारादेखील आजपासून आॅनलाइन देण्यास प्रारंभ होत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात होणार आहे. या दिवशी एकाच वेळी राज्यभरातील अन्य जिल्ह्यांतही डिजिटल सातबारा आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत.