शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

६९ बसची होणार लिलावाद्वारे विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:54 IST

परिवहन समितीचा हिरवा कंदील : दुरुस्तीचा खर्च परवडेना, चालक-वाहकांचीही कमतरता

कल्याण : शहरातील केडीएमटीच्या गणेशघाट आगारात खितपत पडलेल्या ६९ बसची विक्री लिलावाद्वारे करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च आणि चालक, वाहकांची कमतरता पाहता हा निर्णय घेतल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, परिवहन समितीची या प्रस्तावाला मान्यता मिळाली असलीतरी महासभेचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे महासभा या बसेसच्या लिलावविक्रीला मंजुरी देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० व जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारातील ११८ बस अशा एकूण २१८ बस आहेत. यापैकी दोन बसना अपघात झाल्याने सध्या २१६ बस कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमातील बसची संख्या, बसचे आयुर्मान, उपलब्ध चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी, आगारातील उपलब्ध मूलभूत सोयीसुविधा, जुन्या बसच्या दुरुस्तीकरिता येणारा वाढीव खर्च, दिवसागणिक प्रवासी संख्येत होणारी घट त्यामुळे वाढणारी तूट, तसेच केडीएमसीकडून पुरेसे अनुदान मिळण्यास येणाऱ्या अडचणी पाहता बसचे संचालन आणि जुन्या बसचे नियोजन करण्यासाठी परिवहन उपक्रमाने काही निर्णय घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून चालक-वाहकांची कमतरता आणि दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च पाहता गणेशघाट आगारात सद्य:स्थितीला खितपत पडलेल्या ६९ बस लिलावात विकण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता.

२०११ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या ७० बसपैकी एक अपघातग्रस्त बस वगळता उर्वरित ६९ बस विकण्यासाठी ई-निविदा तसेच ई-लिलाव प्रक्रिया अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, ज्या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, त्या बस सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार भंगारात विक्री केल्या जातात. पण, ६९ बसचे आयुर्मान सरासरी ६ ते ८ इतके झालेले असून, सरकारी नियमाप्रमाणे त्यांचे आयुर्मान २ ते ४ वर्षे शिल्लक आहे. परंतु, देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च पाहता आगारात खितपत पडलेल्या बस उभ्या राहून खराब होण्याची शक्यता पाहता त्यांची जशा आहेत, त्या स्थितीत लिलाव करावा, यासंदर्भात प्रस्ताव परिवहन समितीसमोर मंजुरीसाठी आणावा, अशा सूचना २८ जूनच्या बैठकीत सर्व सदस्यांनी केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला सदस्यांनी मान्यता दिली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे.‘त्या’ बसच्या भंगारविक्र ीची प्रक्रिया सुरू : २१६ बसेसपैकी २००७ मध्ये दाखल झालेल्या अशोक लेलॅण्ड मेक स्टॅण्डर्डच्या १० बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. परिवहन समिती आणि महासभेच्या मंजुरीने या बस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी ई-निविदेची कार्यवाही चालू केल्याची माहिती प्रशासनाकडून समितीच्या सदस्यांना देण्यात आली....तर जागा होईलप्रस्तावावरील चर्चेदरम्यान २००५ च्या महापुरात नुकसान झालेल्या जुन्या ४२ बस अद्यापपर्यंत आगारात खितपत पडून असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले होते. यातील काही बस उपक्रमातील इंजीन आणि डिझेल फिल्टर घोटाळ्यातील आहेत. त्यामुळे त्या बस आहेत तशा ठेवण्यात आल्या आहेत. त्या बसचे आयुर्मान संपलेले आहे, पण बस सद्य:स्थितीला भंगार अवस्थेत आहेत. त्यामुळे आगारातील मोठी जागा व्यापली गेली आहे. घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्या बस अन्यत्र हलवण्यात याव्यात, जेणेकरून आगारातील जागा मोकळी होईल, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण