शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

६९ बसची होणार लिलावाद्वारे विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:54 IST

परिवहन समितीचा हिरवा कंदील : दुरुस्तीचा खर्च परवडेना, चालक-वाहकांचीही कमतरता

कल्याण : शहरातील केडीएमटीच्या गणेशघाट आगारात खितपत पडलेल्या ६९ बसची विक्री लिलावाद्वारे करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च आणि चालक, वाहकांची कमतरता पाहता हा निर्णय घेतल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, परिवहन समितीची या प्रस्तावाला मान्यता मिळाली असलीतरी महासभेचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे महासभा या बसेसच्या लिलावविक्रीला मंजुरी देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० व जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारातील ११८ बस अशा एकूण २१८ बस आहेत. यापैकी दोन बसना अपघात झाल्याने सध्या २१६ बस कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमातील बसची संख्या, बसचे आयुर्मान, उपलब्ध चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी, आगारातील उपलब्ध मूलभूत सोयीसुविधा, जुन्या बसच्या दुरुस्तीकरिता येणारा वाढीव खर्च, दिवसागणिक प्रवासी संख्येत होणारी घट त्यामुळे वाढणारी तूट, तसेच केडीएमसीकडून पुरेसे अनुदान मिळण्यास येणाऱ्या अडचणी पाहता बसचे संचालन आणि जुन्या बसचे नियोजन करण्यासाठी परिवहन उपक्रमाने काही निर्णय घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून चालक-वाहकांची कमतरता आणि दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च पाहता गणेशघाट आगारात सद्य:स्थितीला खितपत पडलेल्या ६९ बस लिलावात विकण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता.

२०११ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या ७० बसपैकी एक अपघातग्रस्त बस वगळता उर्वरित ६९ बस विकण्यासाठी ई-निविदा तसेच ई-लिलाव प्रक्रिया अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, ज्या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, त्या बस सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार भंगारात विक्री केल्या जातात. पण, ६९ बसचे आयुर्मान सरासरी ६ ते ८ इतके झालेले असून, सरकारी नियमाप्रमाणे त्यांचे आयुर्मान २ ते ४ वर्षे शिल्लक आहे. परंतु, देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च पाहता आगारात खितपत पडलेल्या बस उभ्या राहून खराब होण्याची शक्यता पाहता त्यांची जशा आहेत, त्या स्थितीत लिलाव करावा, यासंदर्भात प्रस्ताव परिवहन समितीसमोर मंजुरीसाठी आणावा, अशा सूचना २८ जूनच्या बैठकीत सर्व सदस्यांनी केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला सदस्यांनी मान्यता दिली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे.‘त्या’ बसच्या भंगारविक्र ीची प्रक्रिया सुरू : २१६ बसेसपैकी २००७ मध्ये दाखल झालेल्या अशोक लेलॅण्ड मेक स्टॅण्डर्डच्या १० बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. परिवहन समिती आणि महासभेच्या मंजुरीने या बस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी ई-निविदेची कार्यवाही चालू केल्याची माहिती प्रशासनाकडून समितीच्या सदस्यांना देण्यात आली....तर जागा होईलप्रस्तावावरील चर्चेदरम्यान २००५ च्या महापुरात नुकसान झालेल्या जुन्या ४२ बस अद्यापपर्यंत आगारात खितपत पडून असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले होते. यातील काही बस उपक्रमातील इंजीन आणि डिझेल फिल्टर घोटाळ्यातील आहेत. त्यामुळे त्या बस आहेत तशा ठेवण्यात आल्या आहेत. त्या बसचे आयुर्मान संपलेले आहे, पण बस सद्य:स्थितीला भंगार अवस्थेत आहेत. त्यामुळे आगारातील मोठी जागा व्यापली गेली आहे. घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्या बस अन्यत्र हलवण्यात याव्यात, जेणेकरून आगारातील जागा मोकळी होईल, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण