शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

18 गावप्रकरणी सत्यप्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:53 IST

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे. न्यायमूर्ती आर. ए. धानूका व व्ही. जी. बीष्ठ यांच्यासमोर याचिका सुनावणीसाठी होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळण्यात येऊ नये या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने 14 ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना दिले आहेत. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे. न्यायमूर्ती आर. ए. धानूका व व्ही. जी. बीष्ठ यांच्यासमोर याचिका सुनावणीसाठी होती.पाटील यांनी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नयेत अशी मागणी केली आहे. राज्य सरकार, महापालिका आयुक्त, कोकण विभागीय आयुक्त, एमएमआरडीए आयुक्त, ठाणो जिल्हाधिकारी यांनी 14 ऑगस्टर्पयत न्यायालयात सत्यप्रतित्रपत्र सादर करावे असे न्यायालयाने आदेशित केले आहे. राज्य सरकारने 27 गावांपैकी 18 गावे वेगळी करुन त्यांची स्वतंत्र नगरपरिषद तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यावर हरकती सूचना मागविल्या होत्या. 18 पैकी 16 गावातील 8 हजार नागरीकांनी स्वतंत्र नगरपरिषदेला संमती दर्शविली होती.तसे जिल्हाधिका-यांना लेखी कळविले होते. हरकती सूचना पार पडल्यावर त्याचा अहवाल जिल्हाधिका-यांकडून सरकारकडे सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच न्यायालयाने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशापश्चात संबंधित सरकारी यंत्रणा काय सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करता. त्यानंतर पुढील सुनावणी केली जाणार आहे.