शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:20 IST

कारण अस्पष्ट : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने केली चौकशीची मागणी

रवींद्र सोनावळे

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्णांतील शेतकºयांकडून २००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांत खरेदी केलेला आठ कोटी ७१ लाख ५० हजारांचा ५६ हजार क्विंटल भात ११८ गोदामांत ठेवला होता. यातील तीन कोटी ७२ लाखांच्या २४ हजार क्विंटल भाताची भरडाई करून लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ३२ हजार क्विंटल भात शिल्लक असणे अभिप्रेत होते. प्रत्यक्षात १४ हजार क्विंटलच भात आढळून आला आहे. (भरडाईनंतर यातील १० हजार क्विंटल भाताची लिलावाद्वारे शासनाने विक्री केली असून, चार हजार क्विंटल भात कानविंदे येथील मध्यवर्ती गोदामात ठेवण्यात आला आहे.) यात दोन कोटी ७९ हजार रुपये किमतीच्या १८ हजार क्विंटल भाताची घट आढळली आहे. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव किंवा ऊन-वारा-पावसामुळे भात सडला की तो चोरीस गेला, याची चौकशी करण्याची मागणी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापन कार्यालयाकडे केली आहे.

आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भातखरेदीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली असून ३१ मार्चपर्यंत शेतकºयांकडून भातखरेदी करण्यात येणार आहे. एक हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल दराने ही भातखरेदी करण्यात येत असून, भात ठेवण्यासाठी तालुक्यातील शहापूर, किन्हवली, अघई, डोळखांब, खर्डी, अंबर्जे, टेंभा-मढ येथील सात गोदामे दोन रुपये ४० पैसे प्रतिक्विंटल प्रतिमहिना दराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. प्रतिबारदाना शेतकºयांना २० रुपये देण्यात येत आहेत. यावर्षी महिनाभरात चार कोटी ६० लाखांचा २६ हजार ७०० क्विंटल भातखरेदी करण्यात आल्याचे एडगे यांनी सांगितले.किन्हवलीत शेतकºयांचा भात असुरक्षितकिन्हवली भातखरेदी केंद्रांतर्गत बेडिसगाव येथील भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये भातखरेदी करण्यात येत असून खरेदी केंद्रप्रमुख गुलाब सदिगर येथे उशिरा येत असल्याने शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला भात खरेदीअभावी रात्री गोदामाबाहेर ठेवावा लागतो. येथे सुरक्षारक्षक नसल्याने भाताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावतो आहे.कर्मचाºयांचा अभावकर्मचारी संख्या कमी असल्याने केंद्रप्रमुखावरच भातखरेदी करणे आणि त्याची सुरक्षा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कार्यालयात ४६ कर्मचाºयांची मंजुरी असताना अवघे सहाच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातीलही एका कर्मचाºयाने निवृत्ती घेतली असून एक कर्मचारी दीर्घकालीन रजेवर आहे. परिणामी, सध्या चारच कर्मचारी कार्यरत असून निवृत्त कर्मचाºयाला तीन महिन्यांसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने कामात विलंब होत असल्याची खंत एडगे व्यक्त करतात.डोळखांबमध्ये भातखरेदी रखडलीभातखरेदी केंद्रप्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे डोळखांब भातखरेदी केंद्रांतर्गत भातखरेदीचे काम रखडले आहे. ती लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे समजते.गेल्या वर्षी एक हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या सहा कोटी २० लाखांच्या ४० हजार क्विंटल भाताची भरडाई करून शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. - विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :thaneठाणे