शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:20 IST

कारण अस्पष्ट : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने केली चौकशीची मागणी

रवींद्र सोनावळे

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्णांतील शेतकºयांकडून २००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांत खरेदी केलेला आठ कोटी ७१ लाख ५० हजारांचा ५६ हजार क्विंटल भात ११८ गोदामांत ठेवला होता. यातील तीन कोटी ७२ लाखांच्या २४ हजार क्विंटल भाताची भरडाई करून लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ३२ हजार क्विंटल भात शिल्लक असणे अभिप्रेत होते. प्रत्यक्षात १४ हजार क्विंटलच भात आढळून आला आहे. (भरडाईनंतर यातील १० हजार क्विंटल भाताची लिलावाद्वारे शासनाने विक्री केली असून, चार हजार क्विंटल भात कानविंदे येथील मध्यवर्ती गोदामात ठेवण्यात आला आहे.) यात दोन कोटी ७९ हजार रुपये किमतीच्या १८ हजार क्विंटल भाताची घट आढळली आहे. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव किंवा ऊन-वारा-पावसामुळे भात सडला की तो चोरीस गेला, याची चौकशी करण्याची मागणी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापन कार्यालयाकडे केली आहे.

आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भातखरेदीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली असून ३१ मार्चपर्यंत शेतकºयांकडून भातखरेदी करण्यात येणार आहे. एक हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल दराने ही भातखरेदी करण्यात येत असून, भात ठेवण्यासाठी तालुक्यातील शहापूर, किन्हवली, अघई, डोळखांब, खर्डी, अंबर्जे, टेंभा-मढ येथील सात गोदामे दोन रुपये ४० पैसे प्रतिक्विंटल प्रतिमहिना दराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. प्रतिबारदाना शेतकºयांना २० रुपये देण्यात येत आहेत. यावर्षी महिनाभरात चार कोटी ६० लाखांचा २६ हजार ७०० क्विंटल भातखरेदी करण्यात आल्याचे एडगे यांनी सांगितले.किन्हवलीत शेतकºयांचा भात असुरक्षितकिन्हवली भातखरेदी केंद्रांतर्गत बेडिसगाव येथील भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये भातखरेदी करण्यात येत असून खरेदी केंद्रप्रमुख गुलाब सदिगर येथे उशिरा येत असल्याने शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला भात खरेदीअभावी रात्री गोदामाबाहेर ठेवावा लागतो. येथे सुरक्षारक्षक नसल्याने भाताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावतो आहे.कर्मचाºयांचा अभावकर्मचारी संख्या कमी असल्याने केंद्रप्रमुखावरच भातखरेदी करणे आणि त्याची सुरक्षा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कार्यालयात ४६ कर्मचाºयांची मंजुरी असताना अवघे सहाच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातीलही एका कर्मचाºयाने निवृत्ती घेतली असून एक कर्मचारी दीर्घकालीन रजेवर आहे. परिणामी, सध्या चारच कर्मचारी कार्यरत असून निवृत्त कर्मचाºयाला तीन महिन्यांसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने कामात विलंब होत असल्याची खंत एडगे व्यक्त करतात.डोळखांबमध्ये भातखरेदी रखडलीभातखरेदी केंद्रप्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे डोळखांब भातखरेदी केंद्रांतर्गत भातखरेदीचे काम रखडले आहे. ती लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे समजते.गेल्या वर्षी एक हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या सहा कोटी २० लाखांच्या ४० हजार क्विंटल भाताची भरडाई करून शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. - विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :thaneठाणे