शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 07:15 IST

पालघरला सर्वाधिक ११ कोटींची विमाभरपाई

ठाणे : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकºयांनी विमा काढलेला असल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांना तब्बल १८ कोटींच्या नुकसानभरपाईचा लाभ झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना साडेसहा कोटी, तर पालघरच्या शेतकºयांना ११ कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे.

आंबा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. सुदैवाने त्यांनी विमा काढलेला होता. आता त्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांच्या बँक खात्यांत सहा कोटी ६१ लाख ४६ हजार रुपये जमा झाले असून १०० टक्के शेतकºयांना ही भरपाई मिळाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले. या शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार आंब्यांच्या झाडांचा विमा काढला होता.

एका झाडाला मिळाली ८३३ रुपयांची भरपाई

ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार झाडांचा विमा काढला असता, त्यापोटी या शेतकºयांनी ५० लाख ४४ हजार रुपये विमाहप्ता भरला होता. त्यानुसार एका झाडाला ८३३ रुपये भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या थेट बँक खात्यात सहा कोटी ६१ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीने जमा केली आहे.

पालघरच्या २१९५ शेतकºयांना लाभ : पालघर जिल्ह्यातील दोन हजार १९५ शेतकºयांना आंबा व काजूच्या नुकसानभरपाईपोटी तब्बल ११ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. यामध्ये दोन हजार १६३ आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी ९० लाख १२ हजारांचा विमाहप्ता भरला होता. उर्वरित ३२ काजू उत्पादक शेतकºयांपैकी २३ शेतकºयांना ८९ हजार ८४५ रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Mangoआंबा