शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 07:15 IST

पालघरला सर्वाधिक ११ कोटींची विमाभरपाई

ठाणे : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकºयांनी विमा काढलेला असल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांना तब्बल १८ कोटींच्या नुकसानभरपाईचा लाभ झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना साडेसहा कोटी, तर पालघरच्या शेतकºयांना ११ कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे.

आंबा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. सुदैवाने त्यांनी विमा काढलेला होता. आता त्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांच्या बँक खात्यांत सहा कोटी ६१ लाख ४६ हजार रुपये जमा झाले असून १०० टक्के शेतकºयांना ही भरपाई मिळाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले. या शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार आंब्यांच्या झाडांचा विमा काढला होता.

एका झाडाला मिळाली ८३३ रुपयांची भरपाई

ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार झाडांचा विमा काढला असता, त्यापोटी या शेतकºयांनी ५० लाख ४४ हजार रुपये विमाहप्ता भरला होता. त्यानुसार एका झाडाला ८३३ रुपये भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या थेट बँक खात्यात सहा कोटी ६१ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीने जमा केली आहे.

पालघरच्या २१९५ शेतकºयांना लाभ : पालघर जिल्ह्यातील दोन हजार १९५ शेतकºयांना आंबा व काजूच्या नुकसानभरपाईपोटी तब्बल ११ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. यामध्ये दोन हजार १६३ आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी ९० लाख १२ हजारांचा विमाहप्ता भरला होता. उर्वरित ३२ काजू उत्पादक शेतकºयांपैकी २३ शेतकºयांना ८९ हजार ८४५ रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Mangoआंबा