शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आंबा उत्पादकांच्या खात्यात १८ कोटींची मदत; साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 07:15 IST

पालघरला सर्वाधिक ११ कोटींची विमाभरपाई

ठाणे : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकºयांनी विमा काढलेला असल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांना तब्बल १८ कोटींच्या नुकसानभरपाईचा लाभ झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना साडेसहा कोटी, तर पालघरच्या शेतकºयांना ११ कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे.

आंबा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. सुदैवाने त्यांनी विमा काढलेला होता. आता त्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांच्या बँक खात्यांत सहा कोटी ६१ लाख ४६ हजार रुपये जमा झाले असून १०० टक्के शेतकºयांना ही भरपाई मिळाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले. या शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार आंब्यांच्या झाडांचा विमा काढला होता.

एका झाडाला मिळाली ८३३ रुपयांची भरपाई

ठाणे जिल्ह्यातील एक हजार २९४ शेतकºयांनी त्यांच्या ८० हजार झाडांचा विमा काढला असता, त्यापोटी या शेतकºयांनी ५० लाख ४४ हजार रुपये विमाहप्ता भरला होता. त्यानुसार एका झाडाला ८३३ रुपये भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या थेट बँक खात्यात सहा कोटी ६१ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीने जमा केली आहे.

पालघरच्या २१९५ शेतकºयांना लाभ : पालघर जिल्ह्यातील दोन हजार १९५ शेतकºयांना आंबा व काजूच्या नुकसानभरपाईपोटी तब्बल ११ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. यामध्ये दोन हजार १६३ आंबा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी ९० लाख १२ हजारांचा विमाहप्ता भरला होता. उर्वरित ३२ काजू उत्पादक शेतकºयांपैकी २३ शेतकºयांना ८९ हजार ८४५ रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Mangoआंबा