शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नववी नापासांसाठी १७ नंबरचा पर्याय!

By admin | Updated: July 16, 2015 23:31 IST

एन. के. जरग : वर्ष वाचवून दहावी परीक्षेला बसण्याचा सोपा पर्याय

बिर्लागेट : संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने गावांतील मुलामुलींना इयत्ता सातवीनंतरचे पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया करण्याची घोषणा केली. यानंतर, राज्यातील शिक्षण विभागाने शाळाबाह्यमुलांचे सर्वेक्षण केले. याशिवाय, ‘सब बढे, सब पढे’ म्हणत सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शिक्षणावर लाखोंचा खर्च करीत आहे. मात्र, तरीही हजारो मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.कल्याण तालुक्यात १२५ जिल्हा परिषदेच्या शाळा असून ४७८ शिक्षक साडेबारा ते तेरा हजार विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. १०१ गावे आणि १९ पाड्यांत जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथी अथवा सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांना कल्याण, रायते, गोवेली, टिटवाळा, म्हारळ, वरप, मोहने, मांडा अथवा अंबरनाथ, मुरबाड येथे जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी त्यांना बस मिळत नाही. कारण, या गावांमध्ये बसच येत नाही. रस्ते आहेत, जागा आहे, परंतु बस नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.म्हसरोंडी, भोंगळपाडा, आडिवली, वाघेरापाडा, पठारपाडा, नालेपाडा, झापणी, ठाकूरवाडी, अनखर, बेलपाडा, हल, वैतागवाडी, खोडाखडक, बांगरवाडी, काकडपाडा, पळसोली, वेहळे, गणेशवाडी, संतेचापाडा, नांदप, पिंपळोली, वाहोळीपाडा, बांधण्याचापाडा, राया, ओसर्ली, गेरसे, निंबवली, मोस, सांगोडा, कोठेरी, वासुंद्री आदी २० ते ३० गावपाड्यांत बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.म्हसरोंडी गावातील ग्रामस्थांनी बस सुरू करावी म्हणून कल्याण एसटी आगार व्यवस्थापकाकडे अर्ज करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कल्याण आगारात एकूण ७४ बस, ४ मिनीबस आणि ४७८ कर्मचारी आहेत. मात्र, या गावांना बस मिळत नाही. यामुळे ३ ते ४ किमी अंतर तुडवत मुख्य ठिकाणी यावे लागते, अशी व्यथा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यावर लवकरच तोडगा निघण्याची अशा आहे. (वार्ताहर)आमच्या गावात ५९ घरे आणि २८२ कुटुंबे आहेत. गावात रस्ते, लाइट, पाणी, शाळा आहे, मात्र बस नाही. यामुळे १५ ते २० मुलेमुली पुढील शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.- गणपत आगिवले, ग्रामस्थ, म्हसरोंडीबस सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास मी स्वत: याचा पाठपुरावा करतो व बस कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो.- डॉ. प्रदीप पवार, अति. गटशिक्षणाधिकारी, कल्याणआमच्याकडे गावात बस सुरू करण्याबाबत कोणीही अर्ज केले नाहीत. - एस.एन. रूपवते, कल्याण आगारप्रमुख गावातील ठरावीक मुलेच पुढील शिक्षणासाठी पायी ३ ते ४ किमी अंतर चालत जातात.- विशाल आरेकर, शिक्षक, जि.प. शाळा म्हसरोंडी, कल्याण