शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

योग्य उपचाराअभावी १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:41 IST

ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.

मीरा रोड : ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.आंबेडकर नगरातील वैशाली दगडु डुमरे (१७) बारावीत मालेगावच्या कॉलेजमध्ये शिकते. सुट्टीनिमित्त ती घरी आली होती. ताप आल्याने आई - वडिलांनी सोमवारी सकाळी उपचारासाठी जोशी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर तिला रूग्णालयात दाखल केले. पण असह्य वेदना सुरु होऊन नाक व घशातून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर रूग्णालयाने चिठ्ठी देऊन तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले. तिच्या प्लेटलेट घटल्याने जवळच्याच खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितल्याने तिला पुन्हा जोशी रुग्णालयात आणले. हे परिसरातील रहिवासी, नातलगांना कळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, डॉ. सुशील अग्रवाल, जयेश भोईर आदी नगरसेवक तेथे गेले. पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह अन्य डॉक्टरही रुग्णालयात दाखल झाले.तणाव वाढू लागल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. डॉक्टरने तपासणी न करता परिचारिकेनेच उपचार केल्याने आणि वेदना होत असतानाही दुर्लक्ष केल्यानेच वैशालीचा मृत्यू झाल्याची तक्रार वडिलांनी केली. रुग्णालयाने भार्इंदर पोलिसांना फ्लू हे मृत्यूचे कारण कळवले. पण नंतर नातलगांनी टेंबा येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत जे.जे. रूग्णालयात मृतदेह पाठवला. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रात्री आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फोन करून सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वैशालीवर उपचार करण्यासह तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पालाकांच्या भावना आम्ही समजू शकतो.- डॉ. प्रकाश जाधव, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी.रूग्णालय सुरु केले हे केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यापुरतेच आहे. येथे आजही कायम चांगले डॉक्टर व अत्यावश्यक उपचार आणि सुविधा नसल्याने वैशालीचा बळी गेला आहे. या आधीही असे प्रकार घडले आहेत.- रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल