शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

योग्य उपचाराअभावी १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:41 IST

ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.

मीरा रोड : ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.आंबेडकर नगरातील वैशाली दगडु डुमरे (१७) बारावीत मालेगावच्या कॉलेजमध्ये शिकते. सुट्टीनिमित्त ती घरी आली होती. ताप आल्याने आई - वडिलांनी सोमवारी सकाळी उपचारासाठी जोशी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर तिला रूग्णालयात दाखल केले. पण असह्य वेदना सुरु होऊन नाक व घशातून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर रूग्णालयाने चिठ्ठी देऊन तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले. तिच्या प्लेटलेट घटल्याने जवळच्याच खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितल्याने तिला पुन्हा जोशी रुग्णालयात आणले. हे परिसरातील रहिवासी, नातलगांना कळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, डॉ. सुशील अग्रवाल, जयेश भोईर आदी नगरसेवक तेथे गेले. पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह अन्य डॉक्टरही रुग्णालयात दाखल झाले.तणाव वाढू लागल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. डॉक्टरने तपासणी न करता परिचारिकेनेच उपचार केल्याने आणि वेदना होत असतानाही दुर्लक्ष केल्यानेच वैशालीचा मृत्यू झाल्याची तक्रार वडिलांनी केली. रुग्णालयाने भार्इंदर पोलिसांना फ्लू हे मृत्यूचे कारण कळवले. पण नंतर नातलगांनी टेंबा येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत जे.जे. रूग्णालयात मृतदेह पाठवला. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रात्री आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फोन करून सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वैशालीवर उपचार करण्यासह तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पालाकांच्या भावना आम्ही समजू शकतो.- डॉ. प्रकाश जाधव, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी.रूग्णालय सुरु केले हे केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यापुरतेच आहे. येथे आजही कायम चांगले डॉक्टर व अत्यावश्यक उपचार आणि सुविधा नसल्याने वैशालीचा बळी गेला आहे. या आधीही असे प्रकार घडले आहेत.- रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल