शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योग्य उपचाराअभावी १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:41 IST

ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.

मीरा रोड : ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.आंबेडकर नगरातील वैशाली दगडु डुमरे (१७) बारावीत मालेगावच्या कॉलेजमध्ये शिकते. सुट्टीनिमित्त ती घरी आली होती. ताप आल्याने आई - वडिलांनी सोमवारी सकाळी उपचारासाठी जोशी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर तिला रूग्णालयात दाखल केले. पण असह्य वेदना सुरु होऊन नाक व घशातून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर रूग्णालयाने चिठ्ठी देऊन तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले. तिच्या प्लेटलेट घटल्याने जवळच्याच खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितल्याने तिला पुन्हा जोशी रुग्णालयात आणले. हे परिसरातील रहिवासी, नातलगांना कळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, डॉ. सुशील अग्रवाल, जयेश भोईर आदी नगरसेवक तेथे गेले. पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह अन्य डॉक्टरही रुग्णालयात दाखल झाले.तणाव वाढू लागल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. डॉक्टरने तपासणी न करता परिचारिकेनेच उपचार केल्याने आणि वेदना होत असतानाही दुर्लक्ष केल्यानेच वैशालीचा मृत्यू झाल्याची तक्रार वडिलांनी केली. रुग्णालयाने भार्इंदर पोलिसांना फ्लू हे मृत्यूचे कारण कळवले. पण नंतर नातलगांनी टेंबा येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत जे.जे. रूग्णालयात मृतदेह पाठवला. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रात्री आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फोन करून सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वैशालीवर उपचार करण्यासह तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पालाकांच्या भावना आम्ही समजू शकतो.- डॉ. प्रकाश जाधव, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी.रूग्णालय सुरु केले हे केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यापुरतेच आहे. येथे आजही कायम चांगले डॉक्टर व अत्यावश्यक उपचार आणि सुविधा नसल्याने वैशालीचा बळी गेला आहे. या आधीही असे प्रकार घडले आहेत.- रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल