शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उज्ज्वला गॅस योजनेपासून 16 हजार महिला वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:09 IST

सरकारविरोधात संताप : लक्ष्यांंकयादीची प्रतीक्षा करण्याचा सल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्र शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना एलपीजी गॅसची जोडणी (कनेक्शन) मोफत दिले जात आहे. याशिवाय, स्वयंपाकासाठी शेगडीही दिली जात आहे. मात्र, या ६० हजार २८३ लाभार्थी महिलांपैकी ४४ हजार १५२ लाभार्थ्यांचा जिल्ह्यातील लक्ष्यांंक गेल्या वर्षीच पूर्ण झाला आहे. आता जिल्ह्यात ही योजना तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे या लाभापासून वंचित असलेल्या १६ हजारांंवर महिलावर्गात राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या या उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यात ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. मात्र, हा लक्ष्यांंक गेल्याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे या लाभाची अपेक्षा असलेल्या आदिवासी व मागासवर्गीय महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर रेशनिंग दुकानदार व महिलांमध्ये शाब्दिक चकमकीही ऐकायला मिळत आहेत. त्यांची ही नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी पुढील लाभार्थी लक्ष्यांंकाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जात आहे.जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थीसंख्येचा लक्ष्यांंक केंद्र शासनाकडून निश्चित झाल्यानंतर आणि राज्य शासनाने त्यास सहमती दिल्यावर लवकरच या मोफत गॅस कनेक्शन व साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून या योजनेकडे तसे फारसे लक्ष दिले नाही. तरीपण, आता राॅकेल वापरणे बंद करण्यात येणार असल्यामुळे या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेला महत्त्व येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.

मोफत लाभ दिला६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता.