शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उल्हासनगरातील १६ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:58 IST

आयुक्तांकडून चौकशी : कमी वसुली भोवली

उल्हासनगर : एलबीटीची कमी वसुली झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी १६ निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यात ते दोषी सापडल्याने आयुक्तांनी त्यांचे निलंबन कायम ठेवले. तसेच दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसून त्यांच्यावर कमी वसुलीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सरकारने राज्यातील महापालिका जकातकर रद्द करून त्याऐवजी एलबीटी करप्रणाली सुरू केली. एलबीटी करप्रणालीद्वारे पालिकेने तब्बल १५ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी केली. मात्र, बहुतांश व्यापाऱ्यांनी वार्षिक विवरणपत्र सादर न केल्याने, त्यांची करनिर्धारणा झाली नाही. त्यामुळे एलबीटीचे उत्पन्न जकातीपेक्षा कमी झाले. कमी वसुलीचा ठपका तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी ठेवून १६ कर्मचाºयांना निलंबित, तर ५० कर्मचाºयांना नोटीस दिल्या. याप्रकाराने एलबीटीतील सावळागोंधळ ऐरणीवर आला. कमी वसुलीमुळे दरमहा आठ ते नऊ कोटी तर वर्षाला १०० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला.

मनसेने महापालिका एलबीटी विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश तत्कालीन आयुक्तांना दिले. त्यानुसार, सेवानिवृत्त उपसचिव कैलास बोधडे यांच्यांतर्गत चौकशी सुरू होऊन चौकशीत १६ कर्मचारी अंशत: दोषी आढळले. दोषी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, आयुक्त अच्युत हांगे यांनी त्यांचे निलंबन कायम ठेवून त्या दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. पालिका अधिकारी, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून एलबीटी विभागात २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला होता. गेल्याच महिन्यात महापालिका एलबीटी विभागाने पुन्हा वार्षिक विवरणपत्र सादर न करणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून एलबीटीअंतर्गत कर भरण्याचे आदेश दिले आहेत.२०० कोटींचे नुकसानएलबीटी करप्रणालीमुळे महापालिकेचे २०० कोटींचे नुकसान झाल्याचे उघड झाले. जकातीपासून दरमहा १६, तर एलबीटी करप्रणालीद्वारे सात ते आठ कोटींची वसुली झाली. म्हणजे दरमहा आठ तर दोन वर्षांत २०० कोटींचे नुकसान झाले आहे. महापालिका अधिकारी, नगरसेवक व व्यापारी यांच्या संगनमतानुसार एलबीटीकर कमी वसूल झाल्याचा आरोप झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे