शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

बकरी मंडईत १५० कोटींची उलाढाल, पंधरवड्यात वाढली आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:03 IST

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावानजीकच्या बकरी मंडईत आठवडाभरात दीड लाख बक-यांची आवक झाली. त्यामुळे या बाजारात बक-यांच्या विक्रीतून जवळपास १५० कोटींची उलाढाल झाली आहे.

कल्याण : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावानजीकच्या बकरी मंडईत आठवडाभरात दीड लाख बक-यांची आवक झाली. त्यामुळे या बाजारात बक-यांच्या विक्रीतून जवळपास १५० कोटींची उलाढाल झाली आहे.कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार भरतो. त्यात गाई, म्हशी यांची विक्री होते. सध्या दुभत्या म्हशींचा बाजार जास्त असतो. या बाजाराशेजारी १०० वर्षांपासून बैलबाजार होता. त्यामुळे त्या चौक व परिसराला कल्याण बैल बाजार असे नाव पडले. याच बैल बाजारानजीक बकरी अड्डा हा भाग प्रसिद्ध होता. तेथे बोकड व बकºयांची विक्री होत असत. मात्र, १५ वर्षांपूर्वी हा बकरी अड्डा व बकºयांचा बाजार कोनगाव येथे स्थलांतरित झाला. पंचक्रोशीतील मटनविक्रेते येथे बकºयांची खरेदी करण्यासाठी येतात.रमजान ईद संपली की मुस्लिमांना बकरी ईदचे वेध लागतात. बकरी ईदसाठी महिनाभर आधीपासून बकºयांची खरेदी सुरू होते. त्यांना खाऊ पिऊ घातले जाते. त्यानंतर त्याची कुर्बानी दिली जाते. शहरातील धकाधकीच्या जीवनात अनेकांना बकरी ईदसाठी महिनाभर बकरा घेणे जमत नाही. त्यामुळे बकरी ईदच्या दोन-तीन दिवस आधी बकºयांची खरेदी होते. यंदा त्यासाठी कोनच्या बाजारात मागील आठवडाभरात दीड लाख बकºयांची आवक झाली. राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून बकºया या मंडईत आल्या. मात्र, यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात बकºयांची आवक झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. २५ आॅगस्टपासून पावसाचा जोर होता. २९ आॅगस्टला तर त्याने उच्चांक गाठला. पावसाचा फटका बकरी खरेदी-विक्रीलाही बसला. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक हे महामार्ग पावसामुळे एक दिवस बंद होते. खड्डे, पाऊस यामुळे तेथे वाहतूककोंडी झाली. एका बकºयाचे साधारणपणे त्याच्या वजनानुसार २० ते ३० किलो मटन पडते. एका बकºयाची किंंमत १० ते १३ हजार रुपये इतकी असते. आठवडाभरातील दीड लाख बकरे किमान १० हजार रुपयाने विकले गेल्यास १५० कोटींची उलाढाल झाल्याचे स्पष्ट होते.कल्याण, भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ, वांगणी, नेरळ येथे मुस्लिम वस्ती आहे. त्यांच्याकडून बकरी ईदला बकरा खरेदी केला जातो. कुर्बानीच्या बकºयाचे मटन एकमेकांना वाटले जाते. त्यातच बरकत समजली जाते. ज्याच्या डोक्यावर कर्ज असलेले कुर्बानी देत नाहीत.