शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बडोदा महामार्गाच्या भूसंपादनासाठी १५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:26 IST

२१० शेतकऱ्यांना लाभ : अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक लाभ

पंकज पाटीलबदलापूर : बदलापूर शहराजवळून जाणाºया जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदा या द्रुतगती महामार्गातील भूसंपादन प्रक्रि या सुरू झाली असून गेल्या महिनाभरात २१० शेतकºयांना तब्बल १५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून सर्वाधिक मोबदला जलदगतीने अंबरनाथ तालुक्यात देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी जयंतसिंग गिरासे यांनी दिली. राज्यातल्या तीन जिल्ह्यांतल्या ११ तालुक्यांपैकी शेतक ºयांना मोबदल्याचे वाटप करणारा अंबरनाथ तालुका पहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलापूर शहराजवळून जाणारा हा द्रुतगती महामार्ग तीन जिल्ह्यांतील ११ तालुक्यांतून जाणार आहे. या महामार्गातील शेतकºयांना मोबदला देण्यास सर्वप्रथम अंबरनाथ तालुक्यात सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरापासून निघणारी अवजड वाहनांची वाहतूक मुंबई, ठाण्याला बायपास करण्यासाठी बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रायगड, ठाणे आणि पालघर अशा तीन जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील १० गावांपैकी सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. सात गावांतील जवळपास ४०० खातेदारांच्या जमिनीचे मूल्यांकन करून त्यांच्या मोबदल्याचा दर आॅक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यात वाढलेल्या जमिनीच्या दराचा फायदा मिळण्यासाठी तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. इतर तालुक्यांपेक्षा अधिकचा दर या तालुक्यातील शेतक ºयांना मिळाला आहे. त्यात शहरी भागात रेडीरेकनरच्या दरानुसार सहा लाख ७० हजार, तर ग्रामीण भागात दोन लाख ७५ हजार प्रतिगुंठा दर देण्यात आला. या नवीन दरांमुळे या भागातील शेतकºयांना समाधानकारक मोबदला मिळाला आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनींवर हरकती घेण्यात आल्या आहेत, त्यांची सुनावणी घेऊन त्यांचेही मोबदले देणार असल्याचे स्पष्ट केले.जेएनपीटी-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात काही हरकती आल्या आहेत. यातील सुमारे २० टक्के हरकती तक्र ारदारांनीच स्वत:हून मागे घेतल्या आहेत. त्यामुळे उर्वरित हरकतीही मागे घेतल्या जातील. उरलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल.-जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :thaneठाणे