शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बडोदा महामार्गाच्या भूसंपादनासाठी १५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:26 IST

२१० शेतकऱ्यांना लाभ : अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक लाभ

पंकज पाटीलबदलापूर : बदलापूर शहराजवळून जाणाºया जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदा या द्रुतगती महामार्गातील भूसंपादन प्रक्रि या सुरू झाली असून गेल्या महिनाभरात २१० शेतकºयांना तब्बल १५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून सर्वाधिक मोबदला जलदगतीने अंबरनाथ तालुक्यात देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी जयंतसिंग गिरासे यांनी दिली. राज्यातल्या तीन जिल्ह्यांतल्या ११ तालुक्यांपैकी शेतक ºयांना मोबदल्याचे वाटप करणारा अंबरनाथ तालुका पहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलापूर शहराजवळून जाणारा हा द्रुतगती महामार्ग तीन जिल्ह्यांतील ११ तालुक्यांतून जाणार आहे. या महामार्गातील शेतकºयांना मोबदला देण्यास सर्वप्रथम अंबरनाथ तालुक्यात सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरापासून निघणारी अवजड वाहनांची वाहतूक मुंबई, ठाण्याला बायपास करण्यासाठी बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रायगड, ठाणे आणि पालघर अशा तीन जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील १० गावांपैकी सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. सात गावांतील जवळपास ४०० खातेदारांच्या जमिनीचे मूल्यांकन करून त्यांच्या मोबदल्याचा दर आॅक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यात वाढलेल्या जमिनीच्या दराचा फायदा मिळण्यासाठी तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. इतर तालुक्यांपेक्षा अधिकचा दर या तालुक्यातील शेतक ºयांना मिळाला आहे. त्यात शहरी भागात रेडीरेकनरच्या दरानुसार सहा लाख ७० हजार, तर ग्रामीण भागात दोन लाख ७५ हजार प्रतिगुंठा दर देण्यात आला. या नवीन दरांमुळे या भागातील शेतकºयांना समाधानकारक मोबदला मिळाला आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनींवर हरकती घेण्यात आल्या आहेत, त्यांची सुनावणी घेऊन त्यांचेही मोबदले देणार असल्याचे स्पष्ट केले.जेएनपीटी-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात काही हरकती आल्या आहेत. यातील सुमारे २० टक्के हरकती तक्र ारदारांनीच स्वत:हून मागे घेतल्या आहेत. त्यामुळे उर्वरित हरकतीही मागे घेतल्या जातील. उरलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल.-जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :thaneठाणे