शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १५ जणांना चावा

By admin | Updated: May 27, 2017 02:15 IST

शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर व वालधुनी परिसरांत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने १५ जणांचा चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : शहराच्या पश्चिम भागातील रेतीबंदर व वालधुनी परिसरांत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने १५ जणांचा चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हा कुत्रा घरात घुसून चावा घेत आहे. त्याला पकडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. रेतीबंदर परिसरातील तानकी चाळीत राहणारा तीन वर्षांचा मोहंमद हुसेन हा घराच्या बाहेर खेळत होता. त्याला भटक्या कुत्र्याने येऊन चावा घेतला. याच भागात राहणाऱ्या अलिना चांदू या सात वर्षांच्या मुलीला त्याच कुत्र्याने चावा घेतला. नवीद शेख या सोळावर्षीय तरुणाला घरात शिरून चावा घेतला. रेतीबंदर येथे राहणाऱ्या संजय यादव या तरुणाच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला आहे. मौलवी कम्पाउंडमध्ये राहणाऱ्या जहांगीर शेख या तीसवर्षीय तरुणाच्या पायाला कुत्र्याने जोराचा चावा घेतला आहे. घराबाहेर बसलेल्या पंचावन्नवर्षीय गौसिया फक्की यांच्या पायाला कुत्रा चावला. ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अब्दुल रेहमान कामली यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. वालधुनी परिसरातील इम्रान शेख या आठ वर्षांच्या मुलाच्या पाठीला व मांडीला कुत्र्याने जबर चावा घेतला आहे. याच परिसरात राहणारी खुशनूर खान ही नऊ वर्षांची मुलगीही कुत्र्याच्या चाव्यात जखमी झाली आहे. या परिसरातील कुत्र्याने एका बकरीच्या तोंडाला चावा घेऊन तिला जखमी केले आहे. तसेच दोन कोंबड्यांवर डल्ला मारला आहे. जखमी झालेल्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.