शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भिवंडीत १५ लाखांचे रसायन जप्त; राहनाळ येथे पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:36 IST

तीन गोदामांमध्ये केला होता बेकायदा साठा

भिवंडी : राहनाळ येथील श्री दत्ता कम्पाउंडमध्ये बेकायदा रसायनांचा साठा केलेल्या गोदामावर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. तेथून १५ लाखांचा साठा जप्त करत व्यापारी व व्यवस्थापकावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.श्रीदत्त कम्पाउंडमधील रसायनांनी भरलेल्या तीन गोदामांवर पोलिसांनी छापा टाकला. ते नवी मुंबई येथील व्यापारी दत्ता देशमुख यांचे आहेत. देशमुख यांनी वेअर हाउसिंग कंपनी सुरू करून रसायनांचा बेकायदा साठा केला होता. याबाबत नारपोली पोलिसांकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांनी गोदाम क्रमांक अ-१७ मध्ये ६६ ड्रम जप्त केले. यांची किंमत चार लाख ६२ हजार आहे. गोदाम क्रमांक अ-१८ मधून ५८ ड्रम जप्त केले. त्याची किंमत चार लाख सहा हजार रुपये आणि गोदाम क्रमांक बी-७ मध्ये ४२ ड्रम व १६१ किलो वजनाचे ४८ ड्रम जप्त केले. यांची किंमत तीन लाख ८४ हजार आहे. गोदामाचे व्यवस्थापक नंदकुमार चिकणे, व्यापारी देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गुटख्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना भिवंडीतून अटकठाणे : मुंबई-ठाणे परिसरात विक्रीसाठी जाणारा ३७ लाख ५५ हजार रु पयांचा गुटखा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी भिवंडीतून जप्त केला. याप्रकरणी विजय सिंग याच्यासह पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गुटखा तसेच चार वाहनांसह सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोरोनामुळे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा तसेच तत्सम पदार्थांचे सेवन, विक्र ी आणि वाहतुकीवर बंदी आहे. तरीही गुटख्याची विक्र ी छुप्या रीतीने सुरूच आहे. भिवंडीतील जानकीबाई कम्पाउंड, वळगाव येथे गुटख्याचा साठा असून, त्याची ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात तस्करी होत असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती.त्याआधारे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने छापा टाकून मुंगीप्पा ट्रान्सपोर्टमधील चार वाहनांमध्ये साठवून ठेवलेला गुटखा जप्त केला. त्याचबरोबर ३७ लाखांची चार वाहने असा ७४ लाख ५५ हजार ९२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नारपोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस तसेच राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी कोपर, भिवंडे येथील आरोपी विजय सिंग याच्यासह इनामुल्ला रहमतुल्ला खान (४४, रा. चारकोप, मुंबई), बसावन खेदू प्रजापती (५२, निझामाबाद, उत्तर प्रदेश), गोविंद धोंडीराम तपघाले (३३, ठाणे) आणि अशरद अब्दुल खान (२८, नारपोली गाव, भिवंडी) या पाच जणांना या प्रकरणात अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे.