शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

परिवहनच्या १२ जागासांठी १५ उमेदवार

By admin | Updated: April 13, 2016 01:44 IST

ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे.

ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात ठेवल्याने आणि मनसे व रिपाइं यांच्यापैकी कुणाच्या उमेदवाराने माघार घ्यायची, याचा तिढा न सुटल्याने होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही परिवहनच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ काँग्रेसच्या एका सदस्याने आपला अर्ज मागे घेतला तर एक अर्ज सोमवारी छाननीत बाद झाला. ठाणे परिवहन समितीवर १२ सदस्यांच्या निवडीकरिता १७ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युनिस शेख यांचा अर्ज छाननीत बाद झाला असून काँग्रेसचे शैलेश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनकडून पवन कदम, साजन कासाय, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, नरेश देसाई आणि संजय भोसले यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सचिन शिंदे यांचा एकमेव अर्ज आता शिल्लक आहे. तर राष्ट्रवादीकडून सुरेंद्र उपाध्ये, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर, सुधाकर नाईक या चार जणांचे अर्ज दाखल आहेत. मनसे कडून राजेश मोरे आणि रिपाइंकडून उत्तम खडसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे केवळ तीन सदस्य समितीवर जाणार असतानाही त्यांचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मनसे अथवा रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर निवडून जाणार आहे. परंतु मनसे अथवा रिपाइंच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीपुढील चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीकडून तकी चेऊलकर, हेमंत धनावडे आणि सुरेंद्र उपाध्यय यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि माजी मंत्री गणेश नाईक गटातील तिघांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)संख्याबळानुसार सेनेचे सर्वाधिक सात सदस्य तर राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य निवडून जावू शकतो. दरम्यान मनसे आणि रिपाइं एकतावादी हे ठामपातील लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असल्याने यातील एकाला राष्ट्रवादीने पाठिंबा देणे अपेक्षित होते.दोन अतिरिक्त उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाच्या पारड्यात किती मते पडणार यावरुनच परिवहनचे दार कोणाला उघडणार याचे गणित ठरणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजाराला ऊत येणार असून, त्यास सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व रिपाइं हे पक्ष जबाबदार आहेत.