शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या १२ जागासांठी १५ उमेदवार

By admin | Updated: April 13, 2016 01:44 IST

ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे.

ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात ठेवल्याने आणि मनसे व रिपाइं यांच्यापैकी कुणाच्या उमेदवाराने माघार घ्यायची, याचा तिढा न सुटल्याने होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही परिवहनच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ काँग्रेसच्या एका सदस्याने आपला अर्ज मागे घेतला तर एक अर्ज सोमवारी छाननीत बाद झाला. ठाणे परिवहन समितीवर १२ सदस्यांच्या निवडीकरिता १७ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युनिस शेख यांचा अर्ज छाननीत बाद झाला असून काँग्रेसचे शैलेश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनकडून पवन कदम, साजन कासाय, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, नरेश देसाई आणि संजय भोसले यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सचिन शिंदे यांचा एकमेव अर्ज आता शिल्लक आहे. तर राष्ट्रवादीकडून सुरेंद्र उपाध्ये, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर, सुधाकर नाईक या चार जणांचे अर्ज दाखल आहेत. मनसे कडून राजेश मोरे आणि रिपाइंकडून उत्तम खडसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे केवळ तीन सदस्य समितीवर जाणार असतानाही त्यांचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मनसे अथवा रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर निवडून जाणार आहे. परंतु मनसे अथवा रिपाइंच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीपुढील चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीकडून तकी चेऊलकर, हेमंत धनावडे आणि सुरेंद्र उपाध्यय यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि माजी मंत्री गणेश नाईक गटातील तिघांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)संख्याबळानुसार सेनेचे सर्वाधिक सात सदस्य तर राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य निवडून जावू शकतो. दरम्यान मनसे आणि रिपाइं एकतावादी हे ठामपातील लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असल्याने यातील एकाला राष्ट्रवादीने पाठिंबा देणे अपेक्षित होते.दोन अतिरिक्त उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाच्या पारड्यात किती मते पडणार यावरुनच परिवहनचे दार कोणाला उघडणार याचे गणित ठरणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजाराला ऊत येणार असून, त्यास सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व रिपाइं हे पक्ष जबाबदार आहेत.