शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

१४ गावांना नळपाणी योजनेद्वारे अखेर मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांना नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी २०१४ पासून शिवसेना सातत्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांना नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी २०१४ पासून शिवसेना सातत्याने पाठपुरावा करीत असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विलंबामुळे अपूर्णावस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे १४ गावांपैकी १० गावांना महिनाभरात पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिली.

शुक्रवारी आमदार राजू पाटील यांनी त्या भागात जाऊन पाणीपुरवठा कामाची पाहणी केली. रमेश पाटील यांनी ही योजना प्रत्यक्षात आणण्याकरिता शिवसेनेने कसे प्रयत्न केले याची माहिती दिली. ते म्हणाले, सन २०१४ साली दहिसर गोठेघर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली. त्यासाठी ६ कोटी ४२ लाखांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. १४ गावांपैकी १० गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात आल्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा योजनेला विलंब होत गेला. योजनेचे काम ठेकेदाराने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने जीवन प्राधिकरणाने ठेकेदाराला दंड आकारला. त्याविरोधात ठेकेदाराने न्यायालयात दाद मागितली. अखेरीस न्यायालयाने ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकले. त्यामुळे योजना चार वर्षे रखडली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी ग्रामीण पाणीपुरवठा टंचाई योजनेमधून १ कोटी ७४ लक्ष २९ हजार ६०१ रुपयांना मंजुरी दिली. सदर योजनेतील जुनी पाइपलाइन वेळोवेळी फुटत असल्यामुळे पाणी वाया गेल्याने एमआयडीसीने ४९ लाख रुपयांचे व्याज व विलंब शुल्क आकारले होते. माजी आमदार सुभाष भोईर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे व्याज व विलंब शुल्काची रक्कम माफ करून मुद्दलाचे चार लाख २१ हजार रुपये पाच ग्रामपंचायतींनी भरले.

सध्या १४ गावांपैकी दहिसर, नावाली, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडार्ली, नागांव, उत्तरशिव, कर्मनगरी, पिंपरी, निघू या गावांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. उर्वरित नारिवली, बाळे, वाकळण व बामाली या चार गावांनाही योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.

.......

माजी आमदार रमेश पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची दहिसर-गोठेघर पाणी योजना (६.४३ कोटी) २०११ ते २०१४ या कालखंडात मंजूर करून आणली होती, परंतु ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडली होती. मी आमदार म्हणून निवडून आल्यावर योजनेची माहिती घेतली व नवीन ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना दिल्या. नवीन ठेकेदारास काम सुरू करण्यास विलंब होईल हे लक्षात आल्याने कल्याण पंचायत समिती बीडीओ पालवे यांच्यासोबत बैठका घेऊन पाण्याच्या टाकीपासून गावात पाण्याची लाइन फिरवावी, अशा सूचना केल्या. स्थानिक जि.प. सदस्यांनीपण त्याचा पाठपुरावा केला आहे हे नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण, २०१४ ला सुरू झालेली ही योजना बंद होती तेव्हा हे झोपले होते का?

- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

..........

वाचली.