शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

शाईच्या खोऱ्यात १४ छोटे बंधारे

By admin | Updated: November 22, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात येणारे शाई धरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. यातून कोकण पाटबंधारे महामंडळाची मनमानीदेखील उघड झाली.

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात येणारे शाई धरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. यातून कोकण पाटबंधारे महामंडळाची मनमानीदेखील उघड झाली. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता या नदीच्या खोऱ्यातील ५२ गावांनी १४ छोटे बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. शाई धरणाऐवजी याबंधाऱ्यांतील पाणी महापालिकांसह सिंचनासाठी मुबलक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे. शाई धरण बांधण्याचा शासनाचा अट्टहास आहे. त्याविरोधात शहापूर तालुक्यातील सहा व मुरबाडच्या पाच आदी ११ ग्रामपंचायतींमधील ५२ गावांतील ग्रामस्थांचा सुमारे दहा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु, सिंचन घोटाळ्यात अनधिकृत प्लॅनमुळे सुमारे आठ महिन्यांपूर्वी नियोजित काळू व शाई धरणांतील भ्रष्टाचारही उघड झाला. त्यामध्ये ठेकेदारासह अन्य तिघांना अटक झालेली आहे.सुमारे तीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या नावाखाली सुमारे दहा वर्षांपासून आंदोलन तीव्र केले. त्यात ४२ गावकऱ्यांवर खटले दाखल झाले. आंदोलनात त्यांना काही अंशी यश मिळाले तरी ते त्यात भारावून गेले नाहीत. त्यांनी शाईऐवजी छोट्याछोट्या बंधाऱ्यांद्वारे पाणी देण्यासाठी एकमत केले. याशिवाय, सुमारे १६०० कोटी खर्चाऐवजी केवळ साडेचारशे कोटी रुपये खर्च होणार असल्याचे जिल्हा प्रशासनास पटवून दिल्याचे शाई धरणविरोधी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारघडे यांनी सांगितले. ५२ गावपाड्यांना संभाव्य शाई धरणामुळे जलसमाधी मिळणार आहे. शिवाय, साडेतीन हजार हेक्टर शेतजमीन तर १२०० हेक्टर वनजमिनीला मुकावे लागणार आहे. यामुळे ते टाळून नियोजनापेक्षा जास्त पाणी साठवता येणारे बंधारे बांधण्याचा शास्त्रोक्त सल्ला या शेतकऱ्यांनी शासनास दिला. ठाणे पालिकेचे पाणी अन्य महापालिकांनाप्रथमत: ठाणे महापालिकेसाठी असलेल्या धरणाचे पाणी अन्य महापालिकांनाही देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, छोट्या बंधाऱ्यांद्वारे ठाण्यासह सर्वांना मुबलक पाणी मिळणे शक्य आहे. त्यासाठी करवेली दरी, शेकटवाडी, बोकडखंड, चांगदेवाचा खोरा, दऱ्याचा बंधारा या ठिकाणांचे सर्वेक्षणही आधीच झाले आहे. उर्वरित उंबराचा खोरा (घोंगडीचा बंधारा), बांदणाचा ओव्हळ, कुंदाचीवाडी, काळू नदीवर साखरवाडीजवळ वाल्हीवऱ्याचा खोरा या ठिकाणी छोटी धरणे बांधून त्यातील पाणी शाई, काळू, डोईफोडी, कानवी या नद्यांमध्ये सोडून ते पुढे काळूच्या साहाय्याने टिटवाळ्यापर्यंत सहज आणून तेथून नेहमीप्रमाणे इतर सर्व महापालिकांना कमी खर्चात देता येणार असल्याच्या अहवालास आता चालना मिळण्याची अपेक्षा आहे.