शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

१४ कर्मचाऱ्याबाबत प्रश्नचिन्हे; उल्हासनगर महापालिकेचा पगार, कामे इतर आस्थापणाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:18 IST

महापालिकेतील प्रकार

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतांना तब्बल १४ कर्मचारी मंत्रालय, उल्हासनगर, अंबरनाथ तहसील व कल्याण पूर्व विधानसभे साठी वर्षानुवर्षे काम करीत असल्याचे उघड झाले. पगार महापालिकेचा कामे इतरांची का? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, कर्मचाऱ्यांना परत बोलावणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेत ७० टक्के अधिकारी व ४० टक्के पेक्षा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शासन प्रतिनियुक्ती वरील अधिकारी महापालिकेला मिळत नसल्याने, वर्ग-१ व २ च्या पदावर कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांची वर्णी लावण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली. या प्रकाराने सर्वच विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र आहे. तसेच महापालिका आस्थापनेवरील १४ कर्मचारी याना संबंधित विभागाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना मंत्रालयात मधुरा केणी, सुनील वलेचा, गौरव जेधे तर कल्याण पूर्व विधानसभा कामासाठी रवींद्र दंगगव्हाळ, विशाल ढोले, सुधाकर पाटील, उल्हासनगर तहसील कार्यालयात दीपक कानोजिया, संदीपान जाधव, किशोर अल्हाट, शरद पाटील, अशोक छोकर तसेच अंबरनाथ तहसील मध्ये साईनाथ चौधरी, अजय जाधव व अनिकेत आदीजन वर्षानुवर्ष काम करीत आहेत. 

महापालिकेचा पगार घेणारे १४ कर्मचारी कोणाच्या आदेशाने मंत्रालय, कल्याण पूर्व विधानसभा, उल्हासनगर व अंबरनाथ तहसील कार्यालयात सन २०११ नंतर काम करीत आहेत. असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्यावर, महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सासे यांनी १६ डिसेंबर रोजी पालिका आस्थापनेवरील १४ कर्मचारी मंत्रालय, कल्याण पूर्व विधानसभा, उल्हासनगर व अंबरनाथ तहसील मध्ये काम करीत असल्याचे पत्र काढले आहे. पालिकेचा पगार घेणारे कर्मचारी कोणाच्या आदेशानुसार दुसरीकडे काम करीत आहेत. असा प्रश्न सर्वस्तरातून विचारला जात असून सामान्य प्रशासन विभागासह महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

१४ कर्मचाऱ्यांना परत बोलावणार- उपायुक्त सोंडे

महापालिकेचे १४ कर्मचारी वर्षानुवर्षे मंत्रालय, कल्याण पूर्व विधानसभा, उल्हासनगर व अंबरनाथ तहसील कार्यालयात काम करीत आहेत. मात्र महापालिका सर्वांचे पगार काढत असून त्यांना पुन्हा महापालिका आस्थापणावर परत बोलावणार आहे. तसेच याबाबत संबंधित संस्थेकडून अधिकृत आदेश होता काय? याबाबतही तपास करून कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर