शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:06 IST

धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू : मे अखेरीस घरे सोडा, अन्यथा सक्तीने बाहेर काढण्याचा दिला इशारा

ठाणे : पावसाळा दीड महिन्यावर आल्याने ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला असून कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत १३४, तर उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या १०६ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कळव्यात दोन अतिधोकादायक इमारती असून उथळसरमध्ये चार अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत नागरिकांनी स्वत:हून इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने लोकांना घराबाहेर काढावे लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे.ठाणे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना लागू करणे गरजेचे आहे. तसा तत्त्वत: निर्णय घेतला असला, तरी क्लस्टरच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दीड महिन्यानंतर पावसाला सुरु वात होताच शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाच्या वतीने संपूर्ण शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे.शासनाच्या वतीने धोकादायक इमारतींबाबत जे धोरण ठरवून दिले आहे, त्या धोरणानुसारच यावर्षी सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये सी-१ श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ ए मध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्त करण्याजोग्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ बी श्रेणीमध्येसुद्धा इमारत रिकामी न करता दुरु स्त करणे शक्य असलेल्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. तर, सी-३ या श्रेणीमध्ये ज्या इमारतींची किरकोळ दुरु स्ती करायची आहे, अशा इमारतींचा समावेश आहे.ठाण्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्णकळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या चार होती, तर उथळसरमध्ये हीच संख्या सात होती. अतिक्र मण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये कळव्यातील अतिधोकादायक इमारतींची संख्या दोनने तर उथळसरमध्ये ही संख्या तीनने कमी झाली आहे.प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरूआता सर्व इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली आहे. मे पर्यंत संपूर्ण प्रभाग समितीनिहाय इमारतींची माहिती आल्यानंतर नागरिकांनी इमारती दुरु स्त न केल्यास किंवा इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने या इमारती रिकाम्या केल्या जातील, असे अतिक्र मण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे