शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
3
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
4
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
6
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
7
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
8
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
9
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
10
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
11
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
12
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
13
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
14
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
15
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
16
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
17
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
18
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
19
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
20
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:06 IST

धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू : मे अखेरीस घरे सोडा, अन्यथा सक्तीने बाहेर काढण्याचा दिला इशारा

ठाणे : पावसाळा दीड महिन्यावर आल्याने ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला असून कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत १३४, तर उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या १०६ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कळव्यात दोन अतिधोकादायक इमारती असून उथळसरमध्ये चार अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत नागरिकांनी स्वत:हून इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने लोकांना घराबाहेर काढावे लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे.ठाणे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना लागू करणे गरजेचे आहे. तसा तत्त्वत: निर्णय घेतला असला, तरी क्लस्टरच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दीड महिन्यानंतर पावसाला सुरु वात होताच शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाच्या वतीने संपूर्ण शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे.शासनाच्या वतीने धोकादायक इमारतींबाबत जे धोरण ठरवून दिले आहे, त्या धोरणानुसारच यावर्षी सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये सी-१ श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ ए मध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्त करण्याजोग्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ बी श्रेणीमध्येसुद्धा इमारत रिकामी न करता दुरु स्त करणे शक्य असलेल्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. तर, सी-३ या श्रेणीमध्ये ज्या इमारतींची किरकोळ दुरु स्ती करायची आहे, अशा इमारतींचा समावेश आहे.ठाण्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्णकळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या चार होती, तर उथळसरमध्ये हीच संख्या सात होती. अतिक्र मण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये कळव्यातील अतिधोकादायक इमारतींची संख्या दोनने तर उथळसरमध्ये ही संख्या तीनने कमी झाली आहे.प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरूआता सर्व इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली आहे. मे पर्यंत संपूर्ण प्रभाग समितीनिहाय इमारतींची माहिती आल्यानंतर नागरिकांनी इमारती दुरु स्त न केल्यास किंवा इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने या इमारती रिकाम्या केल्या जातील, असे अतिक्र मण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे