शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

मुरबाडमधील सिंगापूरचे १,२०० आदिवासी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 02:05 IST

श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून प्रशासनाची उदासिनता उघड केली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील बहुतांशी गांवपाड्यांमधील गर्भवती आणि स्तनदामातांसह ० ते ६ वयोगटांतील बालकांना गरम ताजा आहार, अंडी, केळी यांचे नियमित वाटप होत नसतांनाही सर्व काही सुरळीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून सतत भासवले जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळेच मुरबाड तालुक्यातील तब्बल चार आदिवासी गावपाडे या आहाराच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून प्रशासनाची उदासिनता उघड केली आहे.‘लोकमत’ने ‘पोषण आहार राम भरोसे’ या मथळ्याखाली ५ मे रोजी, तर ‘१,४३२ कुपोषित बालकांचा जीव मुठीत’ या मथळ्याखाली २३ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील या पोषण आहार वाटपाच्या दुर्लक्षितपणाकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे. परंतु, ठरविक गांव, त्यातील परिवार आदी माहिती विचारून आपल्या गलथानपणावर पांघरून घालणाºया या प्रशासनाच्या नाकर्तेपणा व निष्काळजीमुळे मुरबाड तालुक्यातील या चार गावांची मिळून एक हजार १८४ आदिवासी लोकसंख्या या अमृत आहारासकट अनेक योजनांपासून वंचित राहिल्याचे वाभाडे श्रमिक मुक्तीने आता काढले आहेत. पोषण आहार योजनांचे लाभार्थी माता, महिला, कुमारीका, कुपोषित बालके आदींची आकडेवारी गुलदस्त्यात ठेऊन जिल्ह्यातील काम अगदी सुरळीत सुरू असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून भासवले जात आहे. सीईओ यांनी आदेश देऊनही आकडेवारी दडवून ठेवणाºया या प्रशासनाकडील नोंदीपेक्षा जास्त कुपोषित बालके, गर्भवती माता, स्तनदा माता व विद्यार्थिंनी जिल्ह्यात असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस केलेले आहे.कुपोषण कमी करण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना २०१५ पासून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावपाड्यांत या योजनेचा लाभ अजूनही पोहोचलेला नाही. तर, काही ठिकाणी वाटपात सातत्य नाही. त्यामुळे गर्भवती, स्तनदा मातांना ताजा गरम आहार मिळत नसल्याचे तुळपुळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.पाच वर्षे पोषण आहारच नाहीया आहारापासून वंचित वाड्यांमध्ये वाघवाडी, ढोबेवाडी, कोळेवाडी व काठेवाडी या चार आदिवासी वाड्या मिळून तयार झालेल्या या सिंगापूर या गावाचा समावेश आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सिंगापूर ग्रामपंचायतीतील १०० टक्के आदिवासी लोकसंख्येच्या चार वाड्यांतील पात्र लाभार्थी या आहारापासून गेली पाच वर्षे वंचित आहेत. पळू या महसुली गावाचे १५ ते २० वर्षांपूर्वी विभाजन होऊन त्यातील या चार गावांचे सिंगापूर हे स्वतंत्र गाव घोषित केलेले आहे.

टॅग्स :thaneठाणे