शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

मानवी आरोग्यास घातक मांगूर माशांची १२ लाख अंडी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:57 IST

मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत.

पालघर : मानवी आरोग्याला अत्यंत घातक असल्याने राज्यात बंदी घातलेल्या मांगूर माशांची विक्रमगडमधील शेतात छुपी पैदास करणाऱ्या तीन आरोपींवर सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर यांनी धाड घालून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी १२ लाख अंडी नष्ट करण्यात आली.मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मांगूर मासे आतापर्यंत नष्ट करण्यात आले असून या माशांचे कुठेही उत्पादन घेतले जाऊ नये याकडे मत्स्यव्यवसाय विभाग, पोलीस लक्ष ठेवून होते. विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे (शिंपीपाडा) येथील कुलदीप पाटील यांच्या शेतावर बंदी घातलेल्या मांगूर माशांचे प्रजनन व संवर्धन केले जात असल्याची माहिती पालघर-ठाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी अधिकारी दिनेश पाटील, सुरेंद्र गावडे, विक्रमगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. मोरे, महावीर जगताप यांच्यासह रविवारी शेतावर धाड घातली. यावेळी १०० किलो मांगूर मासे आणि १० ते १२ लाख मांगूर माशांद्वारे प्रजनन केलेली अंडी असा साठा त्यांना मिळून आला. या प्रकरणी शेताचे मालक कुलदीप पाटील, आजीम खान सईद अख्तर (रा. माहीम-मुंबई आणि गुलाम शेख रा. जोगेश्वरी) यांच्याविरोधात विक्रमगड पोलिसात कारवाई करण्यात आल्याची माहिती पालव यांनी दिली. मांगूर माशाला कुजलेल्या बैल, शेळी, कोंबड्या यांचे मांस अन्न म्हणून दिले जात असल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊन कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने त्यावर शासनाने बंदी घातली आहे. दरम्यान,  आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनीत  व्यापारी मांगूर माशांचे उत्पादन घेत असल्याचे आढळले आहे.आम्ही भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव येथील वनविभागाच्या जागेत अनधिकृतरीत्या बनविलेल्या १७ तलावांना नोटिशी बजावल्या असून पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत.- आनंद पालव, सहायक आयुक्तया माशांना परप्रांतीयांच्या वस्तीत मोठी मागणी असून त्यांची विक्री करून आर्थिक कमाई करण्याचा डाव उधळला गेला आहे.