शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

मानवी आरोग्यास घातक मांगूर माशांची १२ लाख अंडी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:57 IST

मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत.

पालघर : मानवी आरोग्याला अत्यंत घातक असल्याने राज्यात बंदी घातलेल्या मांगूर माशांची विक्रमगडमधील शेतात छुपी पैदास करणाऱ्या तीन आरोपींवर सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर यांनी धाड घालून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी १२ लाख अंडी नष्ट करण्यात आली.मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरलेत्या आफ्रिकन मांगूर माशांवर राज्य शासनाने बंदी घातली असून या माशांचे उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उत्पादन क्षेत्र नष्ट करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मांगूर मासे आतापर्यंत नष्ट करण्यात आले असून या माशांचे कुठेही उत्पादन घेतले जाऊ नये याकडे मत्स्यव्यवसाय विभाग, पोलीस लक्ष ठेवून होते. विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे (शिंपीपाडा) येथील कुलदीप पाटील यांच्या शेतावर बंदी घातलेल्या मांगूर माशांचे प्रजनन व संवर्धन केले जात असल्याची माहिती पालघर-ठाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी अधिकारी दिनेश पाटील, सुरेंद्र गावडे, विक्रमगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. मोरे, महावीर जगताप यांच्यासह रविवारी शेतावर धाड घातली. यावेळी १०० किलो मांगूर मासे आणि १० ते १२ लाख मांगूर माशांद्वारे प्रजनन केलेली अंडी असा साठा त्यांना मिळून आला. या प्रकरणी शेताचे मालक कुलदीप पाटील, आजीम खान सईद अख्तर (रा. माहीम-मुंबई आणि गुलाम शेख रा. जोगेश्वरी) यांच्याविरोधात विक्रमगड पोलिसात कारवाई करण्यात आल्याची माहिती पालव यांनी दिली. मांगूर माशाला कुजलेल्या बैल, शेळी, कोंबड्या यांचे मांस अन्न म्हणून दिले जात असल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊन कॅन्सरसारख्या आजाराची लागण होत असल्याने त्यावर शासनाने बंदी घातली आहे. दरम्यान,  आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनीत  व्यापारी मांगूर माशांचे उत्पादन घेत असल्याचे आढळले आहे.आम्ही भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव येथील वनविभागाच्या जागेत अनधिकृतरीत्या बनविलेल्या १७ तलावांना नोटिशी बजावल्या असून पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत.- आनंद पालव, सहायक आयुक्तया माशांना परप्रांतीयांच्या वस्तीत मोठी मागणी असून त्यांची विक्री करून आर्थिक कमाई करण्याचा डाव उधळला गेला आहे.