शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आदिवासी महामंडळाची ११० कोटींची भातखरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST

वासिंद : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार क्विंटल भातखरेदी झाली असून, या ...

वासिंद : आदिवासी विकास महामंडळअंतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पाच लाख ९३ हजार क्विंटल भातखरेदी झाली असून, या भातखरेदीची किंमत ११० कोटी ६२ लाख ८९ हजार ५१३ रुपये आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत खरेदी योजना हंगाम अंतर्गत ही खरेदी झाली आहे.

यंदा भातकापणी हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. त्यातच शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धान्यापैकी थोडेफार घरी खावटीसाठी ठेवून उरलेल्या भाताची महामंडळाच्या केंद्रावर विक्री केली. आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार मुख्य प्रादेशिक कार्यालयांतर्गत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शहापूर, विक्रमगड, मनोर, कासा, मोखाडा असे पाच उपप्रादेशिक कार्यालये असून यामध्ये एकूण ३९ खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर भातखरेदी सुरू असून ती ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

सध्या खरेदी झालेल्या भातखरेदीमध्ये ठाणे जिल्ह्यात तीन लाख तीन हजार ७७७ क्विंटल, तर पालघरमध्ये दोन लाख ८० हजार क्विंटल भातखरेदी झाली आहे. ठाणे, रायगडची ५८ कोटी ५९ लाख ४९ हजार ५१३ रुपये तर पालघर जिल्ह्याची ५२ कोटी तीन लाख ४० हजार अशी मिळून ११० कोटी ६२ लाख ८९ हजार ५१३ रुपये असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे व उपप्रादेशिक व्यवस्थापक ए.वी. वसावे यांनी सांगितले.