शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात १०७५ मिमी पावसाने अनेक रस्ते, पूल पाण्याखाली, घरे, दुकानांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

ठाणे : जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक एकूण एक हजार ७५ मिमी पाऊस पडला आहे. ...

ठाणे : जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक एकूण एक हजार ७५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात हा सरासरी १५२ मिमी पाऊस झाल्याने नदीनाल्यांना पूर येऊन शहरांसह ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर उल्हासनदीने सोमवारी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण तालुक्यातील म्हारळगाव, कांबा, वरप गावातील ही निवासी भागात पाणी घुसले. भिवंडी शहर, ठाण्याचा दिवा परिसरात अनेक चाळींत पाणी घुसले असून डोंबिवली स्टेशन परिसरातील दुकानांतही पावसाचे पाणी शिरले आहे. महापे-शीळ-कल्याण मार्गही बंद ठेवण्यात आला आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर होता. भातसा धरणात आज ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला तर बारवीत ४४ पक्के पाणीसाठा गेल्या २४ तासांत वाढला आहे.

कसारा येथील शिवाजीनगरमध्ये दोन कच्ची घरे पडली असून तेथील लोकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केले आहे. याच परिसरात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने उपनगरीय वाहतूक बंद झाली होती. तर या कसारा घाटातील महामार्गावर दरड कोसळली होती. यामुळे काही काळ वाहतूक कोंंडी झाली. कल्याणच्या टिटवाळा नजीकचा रुंदे पूल काळू नदीच्या पाण्याखाली गेला आहे. तर वज्रेश्वरी नजीक भातसा नदीवरील वालकस पूलही पाण्याखाली गेला आहे. तानसानदीच्या पुरामुळे बेलवड पुलावरून पाणी वाहू लागल्याने खर्डी वाडा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वासिंद नजीकच्या रेल्वे मार्गाखालील मार्गिकेत पाणी साचल्याने परिसरातील ४४ गावांचा संपर्क तुटला आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसभर पाऊस संततधार कोसळला. यात ठाणे शहर परिसरात सरासरी १५२.६ मिमी, तर कल्याणला १७७.५ मिमी., मुरबाडला ९७.५ मिमी. पाऊस पडला आहे. तर भिवंडीला १८०.५ मिमी, शहापूरला १६८ मिमी पाऊस पडला असून उल्हासनगरला १४९.५ मिमी आणि अंबरनाथला १४६ पाऊस पडलेला आहे. जिल्ह्यात हा सरासरी १५२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.