शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

१०१ पंचायती मतदानास सज्ज

By admin | Updated: April 17, 2016 01:02 IST

जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी २१ ग्रा.पं.चे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १०१ ग्रा.पं.साठी ३१० मतदान केंद्रांवर रविवार, १७ एप्रिल रोजी मतदान

ठाणे: जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी २१ ग्रा.पं.चे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १०१ ग्रा.पं.साठी ३१० मतदान केंद्रांवर रविवार, १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी संबंधित गावपाड्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदानासाठी सज्ज झालेल्या १०१ ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी एक हजार ६०४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. यातून ६४७ उमेदवारांची सदस्य म्हणून निवड होणार आहे. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीतील त्यात्या गावांतील मतदार या ग्रा.पं.ला मतदान करणार आहेत. तर, दोन ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान केले जाणार आहे. या वेळी १०१ ग्रा.पं.साठी हजारो मतदार ३१० मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. त्यासाठी ६३५ व्होटिंग मशिन्स वापरल्या जाणार आहेत. रविवारी मतदान होणाऱ्या या ग्रा.पं.ची मुदत मे ते आॅगस्टदरम्यान संपणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या मुदतपूर्व निवडणुका हाती घेतल्या आहेत. निवडणुकीला उभ्या असलेल्या या एक हजार ६०४ उमेदवारांना होणाऱ्या मतदानाची मतमोजणी १८ एप्रिलला संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणात होणार आहे. गुरुवारची चैत्र अमावस्या असल्यामुळे या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडण्याची हिंमत केली नव्हती. पण, गुढीपाडव्याचा सर्वोत्तम मुहूर्त साधून उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. यामुळे उमेदवारांना जेमतेम ११ दिवस प्रचारासाठी मिळले होते. मात्र, अमावस्येच्या भीतीने उमेदवारांनी दोन दिवस प्रचार करणे थांबवले होते. यामुळे केवळ नऊ दिवसच त्यांना प्रचारासाठी मिळाले आहेत. त्यादरम्यान मतदारांना विविध आश्वासनांची खैरात करून आपल्या दिशेने त्यांचे मतदान वळवण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला आहे.या निवडणुकीत शहापूर तालुक्यात सर्वाधिक ६७ ग्रा.पं., मुरबाडच्या २९, भिवंडीमधील २७ आणि अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रा.पं.चा समावेश आहे.