शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अमृत अभियानांतर्गत १ हजार कोटींची कामे

By admin | Updated: June 25, 2016 01:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत.‘अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. भविष्यात एमआयडीसीवर अवलंबून न राहता उल्हास नदीतून थेट पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून जलकुंभाद्वारे त्याचा पुरवठा करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, या योजनेची अंदाजे किंमत ३९९ कोटी इतकी प्रस्तावित आहे. २७ गावांव्यतिरिक्त महापालिका हद्दीतही सात नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने नवीन मुख्य जलवाहिन्या टाकणे व शहरातील नवीन विकसित झालेल्या हद्दीत वितरण व्यवस्था उभी करणे, नवीन जलकुंभांचे झोन तयार करून अस्तित्वात असलेल्या झोनमध्ये बदल करणे व समप्रमाणात वाटप करण्यासाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या कल्याण परिसरातील उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळिवली, गंधारे, कचोरे, लोकग्राम तर डोंबिवली विभागातील चोळे, कोपर, मोठागाव, ठाकूरवाडी व टिटवाळा विभागातील पश्चिम व पूर्वमध्ये मलनि:सारण व्यवस्थेसाठी १३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अस्तित्वातील मलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कल्याणमधील १६ दशलक्ष लीटर, तर डोंबिवलीतील १४ दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. शहाड ते टिटवाळा दरम्यान मोहने, मोहिली, बल्याणी, टिटवाळा आदी भागांत मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्पाच्या कामासाठी १४२ कोटींचा अहवाल तयार केला.