शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अमृत अभियानांतर्गत १ हजार कोटींची कामे

By admin | Updated: June 25, 2016 01:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत.‘अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. भविष्यात एमआयडीसीवर अवलंबून न राहता उल्हास नदीतून थेट पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून जलकुंभाद्वारे त्याचा पुरवठा करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, या योजनेची अंदाजे किंमत ३९९ कोटी इतकी प्रस्तावित आहे. २७ गावांव्यतिरिक्त महापालिका हद्दीतही सात नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने नवीन मुख्य जलवाहिन्या टाकणे व शहरातील नवीन विकसित झालेल्या हद्दीत वितरण व्यवस्था उभी करणे, नवीन जलकुंभांचे झोन तयार करून अस्तित्वात असलेल्या झोनमध्ये बदल करणे व समप्रमाणात वाटप करण्यासाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या कल्याण परिसरातील उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळिवली, गंधारे, कचोरे, लोकग्राम तर डोंबिवली विभागातील चोळे, कोपर, मोठागाव, ठाकूरवाडी व टिटवाळा विभागातील पश्चिम व पूर्वमध्ये मलनि:सारण व्यवस्थेसाठी १३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अस्तित्वातील मलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कल्याणमधील १६ दशलक्ष लीटर, तर डोंबिवलीतील १४ दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. शहाड ते टिटवाळा दरम्यान मोहने, मोहिली, बल्याणी, टिटवाळा आदी भागांत मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्पाच्या कामासाठी १४२ कोटींचा अहवाल तयार केला.