शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: May 30, 2017 05:56 IST

इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनवर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/डोंबिवली : इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनवर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ठाणे शहराचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कन्या स्नेहा जयस्वाल हिने ९७.६ टक्के गुण मिळवले आहे. ती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी आहे. डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेतील चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयात, तर पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.ठाणे शहरातील लोढा वर्ल्ड स्कूल, हिरानंदानी स्कूल, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल आणि बिल्लाबाँग स्कूल या चार शाळांचे विद्यार्थी या बोर्डाच्या परीक्षेस बसले होते. लोढा वर्ल्ड स्कूलमधील १० विद्यार्थी, सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील ४८५ विद्यार्थी, बिल्लाबाँग शाळेतील ८३ विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरले होते. बिल्लाबाँग शाळेच्या केवल देढिया याने ९८.८ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. हिरानंदानी शाळेतील २४० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डोंबिवलीच्या ओंकार शाळेच्या चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयात १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांचे मिळून एकूण ९७ टक्के गुण मिळवले आहेत. चैतन्यला कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील, हे अपेक्षित होते. त्याने इंग्रजीवरही अधिक भर दिला होता. चैतन्यचे वडील कृष्णा हे मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई अनुराधा ही गृहिणी आहे. त्याचा एक लहान भाऊ सातवीच्या वर्गात शिकत आहे. चैतन्यला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांत ९७.४ टक्के गुण मिळवले आहेत. पार्थला गणितात जास्त गुण मिळतील, याची खात्री होती. पण, सोशल स्टडीजची नव्हती. मात्र, दोन विषयांतील शंभर नंबरी यशामुळे त्याला अत्यानंद झाला आहे. तो सुरुवातीपासून दररोज तीन तास अभ्यास करत होता. आॅगस्टपासून तो दररोज पाच तास अभ्यास करत होता. त्याचे वडील संदीप हे सिव्हील इंजिनीअर, तर आई गृहिणी आहे. पार्थला पुढे संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. राज्यात सहावा-सातवाआयसीएसई बोर्डाने घेतलेल्या इयत्ता बारावीचाही निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे ३१४ विद्यार्थी, तर हिरानंदानी शाळेतील ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंघानिया शाळेच्या बारावीच्या आयएससी बोर्डातून जेहेब अहमद मकानी याने ९८.५ टक्के गुण तसेच, मैत्री तिवारी हिने ९७.५ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यात अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे.स्नेहाला मिळालेले यश सर्वात मोठे आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटतो. - संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका