शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

ठाण्यातील शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: May 30, 2017 05:56 IST

इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनवर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/डोंबिवली : इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनवर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ठाणे शहराचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कन्या स्नेहा जयस्वाल हिने ९७.६ टक्के गुण मिळवले आहे. ती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी आहे. डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेतील चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयात, तर पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.ठाणे शहरातील लोढा वर्ल्ड स्कूल, हिरानंदानी स्कूल, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल आणि बिल्लाबाँग स्कूल या चार शाळांचे विद्यार्थी या बोर्डाच्या परीक्षेस बसले होते. लोढा वर्ल्ड स्कूलमधील १० विद्यार्थी, सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील ४८५ विद्यार्थी, बिल्लाबाँग शाळेतील ८३ विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरले होते. बिल्लाबाँग शाळेच्या केवल देढिया याने ९८.८ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. हिरानंदानी शाळेतील २४० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डोंबिवलीच्या ओंकार शाळेच्या चैतन्य बुलुसू याने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयात १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांचे मिळून एकूण ९७ टक्के गुण मिळवले आहेत. चैतन्यला कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील, हे अपेक्षित होते. त्याने इंग्रजीवरही अधिक भर दिला होता. चैतन्यचे वडील कृष्णा हे मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई अनुराधा ही गृहिणी आहे. त्याचा एक लहान भाऊ सातवीच्या वर्गात शिकत आहे. चैतन्यला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. पार्थ पाटील याने गणित व सोशल स्टडीज या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवताना सर्व विषयांत ९७.४ टक्के गुण मिळवले आहेत. पार्थला गणितात जास्त गुण मिळतील, याची खात्री होती. पण, सोशल स्टडीजची नव्हती. मात्र, दोन विषयांतील शंभर नंबरी यशामुळे त्याला अत्यानंद झाला आहे. तो सुरुवातीपासून दररोज तीन तास अभ्यास करत होता. आॅगस्टपासून तो दररोज पाच तास अभ्यास करत होता. त्याचे वडील संदीप हे सिव्हील इंजिनीअर, तर आई गृहिणी आहे. पार्थला पुढे संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. राज्यात सहावा-सातवाआयसीएसई बोर्डाने घेतलेल्या इयत्ता बारावीचाही निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे ३१४ विद्यार्थी, तर हिरानंदानी शाळेतील ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंघानिया शाळेच्या बारावीच्या आयएससी बोर्डातून जेहेब अहमद मकानी याने ९८.५ टक्के गुण तसेच, मैत्री तिवारी हिने ९७.५ टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यात अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्र मांकावर स्थान मिळवले आहे.स्नेहाला मिळालेले यश सर्वात मोठे आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटतो. - संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका