शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 14:43 IST

एसटीच्या कळवा विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

ठाणे : एसटी महामंडळाच्या कळवा येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी हे आता विविध समस्यांनी ग्रासले असून या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील कर्मचाºयांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. ४०० कर्मचाºयांचे काम हे १०० कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. आरटीओ पासींग गाड्यांची कामे तीन दिवसाऐवजी एका दिवसात करुन घेतली जात असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. एकूणच यातून मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.कळवा येथील विभागीय कार्यशाळेचे बांधकाम हे २० वर्षे जून असून पूर्वी याठिकाणी ४०० च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. परंतु २०१७ नंतर नवीन कर्मचाऱ्यांचीच भरतीच न झाल्याने ४०० कर्मचाऱ्यांचे काम १०० कर्मचाºयांना करावे लागत आहे. या ठिकाणी आरटीओ पासीगंच्या गाडयांची कामे तसेच ८ डेपोच्या गाडयांच्या रिपेअरिंगचे कामे, बॉडीची कामे, पेंटींगची कामे, तसेच इंजिन गेअरबॉक्स, क्लचप्लेट, क्रशर प्लेट, पिनीअन, जॉईंटस रेडीएटर, पाटे, वेल्डींग, अपोहस्टर खाते, इलेक्ट्रीशिअनची कामे, फ्रंट अ‍ॅक्सल ही सर्व रिपेअरिंगचे कामे जवळपास ७०० गाडयांची कामे केली जातात ही कामे करत असतांना कर्मचा-यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

आरटीओ पासिंग गाडयांची कामे ३ दिवसाचे काम एका दिवसामध्ये सक्तीने करुन घेतले जाते. नाही केल्यास प्रशासकीय दबाव टाकला जातो. म्हणजेच बदली करून चार्जशिट घेऊन पंचिंग कार्ड जमा करुन अर्धा दिवसाचा पगार कापुन अशा धमक्या देऊन कर्मचा-यांची मानसिक खराब केली जाते. हेवी वर्क असल्याने ५० टक्के कर्मचारी हे शारिरीक व्याधीनी त्रस्त आहेत. व काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. संपुर्ण वर्कशॉपचे बांधकाम पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ९० ते १०० कर्मचा-यांचा जिव धोक्यात आहे. टॉयलेट, बाथरुम अस्वच्छ व पडक्या स्थितीत आहे व तसेच वर्कशॉपच्या आवारामध्ये साफसफाई केली जात नाही, अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटी व रुग्णवाहिकेची सोय नाही. अत्याधुनिक यंत्र सामुग्री तसेच हायड्रॉलिक जाक उपलबध नाहीत.

कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामे म्हणजेच मासिक वेतन वाढ ही ६ महिने ते १ वर्ष उशिराने मिळते. तसेच मेडिकल बिलांचे क्लेम व टी.ए. बिल वेळेत मिळत नाही. कर्मचा-यांना लिव्ह बॅलेंस बद्दल माहिती लवकर मिळत नाही, कर्मचा-यांसाठी कँटिनची व्यवस्था नाही, पाण्याच्या टाक्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी संबधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल आणि कर्मचाºयांना न्याय दिला जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.