शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींची सुनावणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

By admin | Updated: February 10, 2017 03:33 IST

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेल्या १०० कोटींच्या

मुरलीधर भवार , डोंबिवलीडोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेल्या १०० कोटींच्या दंडाच्या वसुलीची सुनावणी त्वरित घेण्याच्या मागणीसाठी पर्यावरणवादी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या दंडाला आधी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आणि प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. त्याला १० महिने उलटून गेले तरी अद्याप उच्च न्यायालयात त्यावर एकही सुनावणी न झाल्याने प्राधान्याने सुनावणीचे आदेश देण्यासाठी ‘वनशक्ती’ ही संस्था सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कंपन्यातून प्रक्रिया केल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात योग्य निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नाही. असे पाणी थेट कल्याण खाडी, उल्हास नदी आणि वालधूनी नदीत सोडले जाते. त्यावर दाद मागूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महांडळाकडून कारवाई केली जात नाही आणि प्रदूषण रोखले जात नसल्याने २०१३ ला हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादापुढे मांडण्यात आले. प्रदूषणास जबाबदार धरून २५ जुलै २०१५ ला लवादाने डोंबिवली व अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्र, औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेला एकत्रित १०० कोटीचा दंड ठोठावला. तो कोकण विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले. दंडाच्या रकमेतून उल्हास व वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्याचे काम हाती घेण्याचे आदेशात म्हटले होते. या दंडाविरोधात कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने दंड भरण्यास स्थगिती दिली. या सुनावणीदरम्यान कारखानदारांनी उल्हास व वालधूनी नदीच्या प्रदूषणास जबाबदार असल्याचे नाकारले आणि प्रक्रिया केलेले सांडपाणीच कल्याण खाडीत सोडले जात असल्याचा दावा केला. दंड भरण्यास स्थगिती दिल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर तेथे ही स्थगिती उठवून सुनावणी पुन्हा उच्च न्यायालयात घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी न आलेले नाही. ते लवकर सुनावणीस घेण्याच्या आदेशासाठी विनंती अर्ज करणार असल्याची माहिती अश्वीन अघोर यांनी दिली.