शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणी कपात

By अजित मांडके | Updated: November 1, 2022 15:34 IST

पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामामुळे कपात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील महिन्यात ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणा:या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १० दिवस मुंबई, ठाणे आणि भिवंडीला १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील धरण क्षेत्रत मुबलक पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांची तुर्तास पाण्याची चिंता मिटली आहे. असे वाटत होते. परंतु ठाणेकरांना पावसाळ्यात आधीच दोन वेळा पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रच्या मुखाजवळ कचरा साठल्याने ठाणोकरांना पाणी कपातीला मुकावे लागले होते. त्यानंतर दिवाळीच्या आधी देखील याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दोन ते तीन दिवस याचे काम करण्यात आले होते. परंतु पाऊस झाल्याने हे काम थांबविण्यात आले होते.  त्यानंतर आता पुन्हा पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले आहे. या कामाचा परिणाम १० दिवस जाणवणार आहे. त्यामुळे दिवाळी संपताच ठाण्यासह, मुंबई आणि भिवंडीला देखील १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करु न ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरु न सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान या पाणी कपातीचा सामना पूर्ण ठाणो शहराला बसणार असल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई महापालिकेकडून कोपरीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे फटका बसणार आहे. तसेच महापालिका पिसे धरणातून पाणी उचलत असल्याने त्याचा परिणाम घोडबंदर, वर्तकनगरसह संपूर्ण ठाणे शहराला बसणार आहे. एकूणच या कपातीचा कालावधीत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून ठाणेकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.