शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:37 IST

भारताविरुद्धची लढत नूर सुल्तानमध्ये होणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप लढत नूर सुल्तानमध्ये खेळेल. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानचे अपील फेटाळताना कजाखस्तानच्या राजधानीला या लढतीचे यजमानपद सोपविले. पाकिस्तान टेनिस महासंघाने या लढतीचे स्थान बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय यात्रेकरू सुरक्षेबाबत कुठली चिंता न करता पाकिस्तानमध्ये येऊ शकतात, तर भारतीय संघ इस्लामाबादमध्ये सामना का खेळू शकत नाही.’आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ४ नोव्हेंबरला डेव्हिस चषक समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आयटीएफने म्हटले की, ‘पाकिस्तान टेनिस महासंघाने इस्लामाबादहून सामना अन्यत्र स्थानांतरित करण्याच्या डेव्हिस कप समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. स्वतंत्र लवादाने १८ नोव्हेंबरला हे अपील फेटाळले.’ त्यात म्हटले गेले की, ‘पीटीएफने तटस्थ स्थळाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेव्हिस कप नियमानुसार डेव्हिस कप समितीने नूर सुल्तान (पूर्वीचे अस्ताना) या शहराची यजमानपदासाठी निवड केली. येथे २९-३० नोव्हेंबरला ही लढत होईल.’सामने इडोअरमध्ये होतील कारण सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. भारताचे प्रशिक्षक जीशान अली म्हणाले,‘इनडोअरमध्ये खेळणे आमच्या खेळाडूंसाठी लाभदायक आहे. हा निर्णय आमच्यासाठी अनुकूल असेल. आमचे खेळाडू ग्रासकोर्टवर खेळू शकत नाही, असे नाही, पण हार्डकोटवर खेळणे त्यांना अधिक आवडते. तेथे सध्या खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये खेळू.’ (वृत्तसंस्था)लढत २९-३० नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती, पण उभय देशांदरम्यानच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना भारताने लढत तटस्थ स्थळी आयोजित करण्याची मागणी केली होती. भारताने या लढतीसाठी मजबूत संघ जाहीर केला होता. कारण पाकिस्तानला जाण्यास नकार देणारे आघाडीचे सर्व खेळाडू तटस्थ स्थळावर खेळण्यास तयार आहेत.भारताचे नेतृत्व सुमित नागल व रामकुमार रामनाथन करतील. लिएंडर पेस व जीवन नेदुचेझियान दुहेरीत खेळतील. रोहन बोपन्नाने खांद्याच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जीशान म्हणाले की, ‘बोपन्नाच्या माघारीनंतर दुहेरीच्या तीन स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय समजदारीचा होता, हे सिद्ध झाले आहे. स्पेशालिस्ट खेळाडूंना राखीव म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय योग्यच होता. बोपन्नाच्या स्थानी आता जीवन खेळेल. आम्ही अंतिम पाचची घोषणा करू शकत नाही, पण जीवन खेळेल. आम्हाला रोहनची उणीव भासेल.’