शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:37 IST

भारताविरुद्धची लढत नूर सुल्तानमध्ये होणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप लढत नूर सुल्तानमध्ये खेळेल. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानचे अपील फेटाळताना कजाखस्तानच्या राजधानीला या लढतीचे यजमानपद सोपविले. पाकिस्तान टेनिस महासंघाने या लढतीचे स्थान बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय यात्रेकरू सुरक्षेबाबत कुठली चिंता न करता पाकिस्तानमध्ये येऊ शकतात, तर भारतीय संघ इस्लामाबादमध्ये सामना का खेळू शकत नाही.’आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ४ नोव्हेंबरला डेव्हिस चषक समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आयटीएफने म्हटले की, ‘पाकिस्तान टेनिस महासंघाने इस्लामाबादहून सामना अन्यत्र स्थानांतरित करण्याच्या डेव्हिस कप समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. स्वतंत्र लवादाने १८ नोव्हेंबरला हे अपील फेटाळले.’ त्यात म्हटले गेले की, ‘पीटीएफने तटस्थ स्थळाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेव्हिस कप नियमानुसार डेव्हिस कप समितीने नूर सुल्तान (पूर्वीचे अस्ताना) या शहराची यजमानपदासाठी निवड केली. येथे २९-३० नोव्हेंबरला ही लढत होईल.’सामने इडोअरमध्ये होतील कारण सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. भारताचे प्रशिक्षक जीशान अली म्हणाले,‘इनडोअरमध्ये खेळणे आमच्या खेळाडूंसाठी लाभदायक आहे. हा निर्णय आमच्यासाठी अनुकूल असेल. आमचे खेळाडू ग्रासकोर्टवर खेळू शकत नाही, असे नाही, पण हार्डकोटवर खेळणे त्यांना अधिक आवडते. तेथे सध्या खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये खेळू.’ (वृत्तसंस्था)लढत २९-३० नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती, पण उभय देशांदरम्यानच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना भारताने लढत तटस्थ स्थळी आयोजित करण्याची मागणी केली होती. भारताने या लढतीसाठी मजबूत संघ जाहीर केला होता. कारण पाकिस्तानला जाण्यास नकार देणारे आघाडीचे सर्व खेळाडू तटस्थ स्थळावर खेळण्यास तयार आहेत.भारताचे नेतृत्व सुमित नागल व रामकुमार रामनाथन करतील. लिएंडर पेस व जीवन नेदुचेझियान दुहेरीत खेळतील. रोहन बोपन्नाने खांद्याच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जीशान म्हणाले की, ‘बोपन्नाच्या माघारीनंतर दुहेरीच्या तीन स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय समजदारीचा होता, हे सिद्ध झाले आहे. स्पेशालिस्ट खेळाडूंना राखीव म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय योग्यच होता. बोपन्नाच्या स्थानी आता जीवन खेळेल. आम्ही अंतिम पाचची घोषणा करू शकत नाही, पण जीवन खेळेल. आम्हाला रोहनची उणीव भासेल.’