शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:37 IST

भारताविरुद्धची लढत नूर सुल्तानमध्ये होणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप लढत नूर सुल्तानमध्ये खेळेल. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानचे अपील फेटाळताना कजाखस्तानच्या राजधानीला या लढतीचे यजमानपद सोपविले. पाकिस्तान टेनिस महासंघाने या लढतीचे स्थान बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय यात्रेकरू सुरक्षेबाबत कुठली चिंता न करता पाकिस्तानमध्ये येऊ शकतात, तर भारतीय संघ इस्लामाबादमध्ये सामना का खेळू शकत नाही.’आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ४ नोव्हेंबरला डेव्हिस चषक समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आयटीएफने म्हटले की, ‘पाकिस्तान टेनिस महासंघाने इस्लामाबादहून सामना अन्यत्र स्थानांतरित करण्याच्या डेव्हिस कप समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. स्वतंत्र लवादाने १८ नोव्हेंबरला हे अपील फेटाळले.’ त्यात म्हटले गेले की, ‘पीटीएफने तटस्थ स्थळाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेव्हिस कप नियमानुसार डेव्हिस कप समितीने नूर सुल्तान (पूर्वीचे अस्ताना) या शहराची यजमानपदासाठी निवड केली. येथे २९-३० नोव्हेंबरला ही लढत होईल.’सामने इडोअरमध्ये होतील कारण सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. भारताचे प्रशिक्षक जीशान अली म्हणाले,‘इनडोअरमध्ये खेळणे आमच्या खेळाडूंसाठी लाभदायक आहे. हा निर्णय आमच्यासाठी अनुकूल असेल. आमचे खेळाडू ग्रासकोर्टवर खेळू शकत नाही, असे नाही, पण हार्डकोटवर खेळणे त्यांना अधिक आवडते. तेथे सध्या खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये खेळू.’ (वृत्तसंस्था)लढत २९-३० नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती, पण उभय देशांदरम्यानच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना भारताने लढत तटस्थ स्थळी आयोजित करण्याची मागणी केली होती. भारताने या लढतीसाठी मजबूत संघ जाहीर केला होता. कारण पाकिस्तानला जाण्यास नकार देणारे आघाडीचे सर्व खेळाडू तटस्थ स्थळावर खेळण्यास तयार आहेत.भारताचे नेतृत्व सुमित नागल व रामकुमार रामनाथन करतील. लिएंडर पेस व जीवन नेदुचेझियान दुहेरीत खेळतील. रोहन बोपन्नाने खांद्याच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जीशान म्हणाले की, ‘बोपन्नाच्या माघारीनंतर दुहेरीच्या तीन स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय समजदारीचा होता, हे सिद्ध झाले आहे. स्पेशालिस्ट खेळाडूंना राखीव म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय योग्यच होता. बोपन्नाच्या स्थानी आता जीवन खेळेल. आम्ही अंतिम पाचची घोषणा करू शकत नाही, पण जीवन खेळेल. आम्हाला रोहनची उणीव भासेल.’