शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

डेव्हिस चषक सामने पाकऐवजी तटस्थस्थळी हवेत - एआयटीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:51 IST

इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.

नवी दिल्ली: पाकिस्तानसोबतच्या संबंध विच्छेदाच्या पार्श्वभूमीवर अ.भा. टेनिस संघटनेला (एआयटीए) डेव्हिस चषक टेनिसचे आयोजन पाकिस्तानात नव्हे तर तटस्थस्थळी हवे आहे. इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने काढल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारतासोबतचे राजकीय संबंध कमी केले.पाकिस्तानातील भारतीय राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले. गुरुवारी पाकने समझोता एक्स्प्रेसदेखील बंद केली. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी यांनी राजकीय संबंधांचा विपरीत परिणाम लढतीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले,‘सध्या काही बोलणार नाही. एक- दोन दिवस प्रतीक्षा करू. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे परिस्थितीवर लक्ष देत निर्णय घेण्याची विनंती करू. गरज भासल्यास तटस्थस्थळी सामने खेळविण्याची विनंती केली जाईल.’चॅटर्जी पुढे म्हणाले की, ‘पाकने व्हिसा नाकारल्यास आम्ही तेथे जाऊ शकणार नाही. व्हिसा दिला तरी पुरेशी सुरक्षा मिळेलच याची खात्री नाही.’ भारताच्या संघाने याआधी १९६४ साली पाकचा दौरा केला होता. उभय देशांतील संबंध २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ताणले गेले. पाकने अनेक सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत. आम्ही पाकला जाणार नाही, असे म्हणत नाही, पण तेथील परिस्थिती नाजूक आहे. तर अन्यत्र सामने खेळविण्यास आयटीएफने नकार दिल्यास काय, असा सवाल करताच चॅटर्जी म्हणाले, ‘सुरक्षेचे नियम आयटीएफने तयार केले आहेत. काही अघटित झाल्यास जबाबदारी त्यांची असेल. याच कारणांमुळे आम्ही परिस्थितीवर गंभीर विचार करण्याची विनंती केली आहे.’ (वृत्तसंस्था)निर्णयाचा सन्मान करू: पीटीएफपाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष(पीटीएफ)सलीम सैफुल्लाह खान यांनी दोन्ही देशांतील तणावामुळे आयटीएफ डेव्हिस चषकाबाबत जो निर्णय घेईल, त्याचा पूर्ण सन्मान करू, असे म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना खान म्हणाले,‘ इस्लामाबाद अद्याप सुरक्षित स्थळ आहे. तणाव वाढला तरी तो निवळू शकतो. आमच्यासाठी खेळाडूंचे हित सर्वतोपरी आहे. जय- पराजय महत्त्वाचा नाही, सुरक्षेला महत्त्व आहे.’ ही लढत तटस्थ ठिकाणी होईल, असे म्हणणे सध्यातरी घाईचे ठरेल. आयटीएफला वाटत असेल की सामन्याचे स्थळ बदलले पाहिजे तर मात्र आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू.