शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डेव्हिस कप : भारताची लढत सर्बियासोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:50 IST

भारतीय टेनिस संघाला डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये पाचव्या मानांकित सर्बियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आज काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार ही लढत १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत पारंपरिक तीन दिवसांच्या पाच सेट प्रारूपामध्ये सर्बियाच्या यजमानपदाखाली खेळली जाईल.

नवी दिल्ली : भारतीय टेनिस संघाला डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये पाचव्या मानांकित सर्बियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.आज काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार ही लढत १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत पारंपरिक तीन दिवसांच्या पाच सेट प्रारूपामध्ये सर्बियाच्या यजमानपदाखाली खेळली जाईल.भारताने अलीकडेच चीनचा ३-२ ने पराभव करीत विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीसाठी पात्रता मिळवली. ही लढत दोन दिवसांच्या तीन सेट प्रारूपामध्ये खेळली गेली.नोव्हाक जोकोव्हीचच्या अनुपस्थितीत सर्बियाला अमेरिका संघाने यंदा फेब्रुवारी महिन्यात ३-१ ने पराभूत केले. यापूर्वी भारत व सर्बिया संघांदरम्यान विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये लढत झाली होती. बंगळुरूमध्ये २०१४ ला खेळल्या गेलेल्या लढतीत सर्बियाने भारताचा ३-२ ने पराभव केला होता.भारतीय डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक झीशान अली म्हणाले, ‘सर्बियाविरुद्ध त्यांच्या देशात खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. तसे विश्व गटात कुठल्याही संघाविरुद्धची लढत सोपी नसते.’ भारत सलग पाचव्या वर्षी विश्व गटातील १६ संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला गेल्या चार प्रयत्नांत सर्बिया (२०१४), चेक प्रजासत्ताक (२०१५), स्पेन (२०१६) व कॅनडा (२०१७) यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी, २०११ मध्ये भारताने विश्व गटात स्थान मिळविले होते. त्या वेळी भारताला सर्बियाविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता.