शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

स्मार्टफोन वापरताय ! मग हे वाचाच

By अनिल भापकर | Updated: January 28, 2018 19:57 IST

एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत आहेत. टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा किबोर्डसाठी असायचा.आता टचस्क्रीनमुळे मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.

ठळक मुद्देआपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. टचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो.

आजकाल जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आदीसुद्धा टचस्क्रीनचे यायला लागलेत. टचस्क्रीन मोबाईल हे इतर फिजीकल किबोड मोबाईलपेक्षा वापरायला सोपे आणि  फास्ट असतात. हल्लीच्या विविध डिक्शनरी अ‍ॅपमुळे तसेच मोबाईलच्या आॅपरेटिंग सिस्टीम मध्येसुद्धा असणाऱ्या  डिक्शनरीमुळे टचस्क्रीनचा टायपिंग स्पीड हा जास्त असतो. त्याचप्रमाणे टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा  किबोर्डसाठी असायचा आता टचस्क्रीनमुळे  मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत  आहेत. अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची  संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.टचस्क्रीनची काय काळजी घ्याल?1) नखाचा वापर करू नका-आपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन  हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.२) हळूच टच  करा-अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. मात्र ही मंडळी एवढ्या जोरात टचस्क्रीन प्रेस करतात की, त्यामुळे अनेकांचे टचस्क्रीन खराब देखील झाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीनला कधीही जोराने प्रेस करून वापरू नका. अगदी आल्हाद स्पर्श केला तरी टचस्क्रीन काम करतो.३) सूर्यकिरणांचा संपर्क टाळाटचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो. त्यामुळे चारचाकी मध्ये प्रवास करताना मोबाईल ज्या  दिशेने ऊन येते त्या ठिकाणी  ठेऊ नका.४) छोटा कपडा नेहमी जवळ बाळगाटचस्क्रीन  व्यवस्थित काम करण्यासाठी तो स्वच्छ  असणे गरजेचे असते. धूळ किंवा इतर काही कारणाने टचस्क्रीन अस्वच्छ झाला असल्यास त्याला त्वरित चांगल्या  स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यासाठी मऊ स्वच्छ कपडा  नेहमी जवळ ठेवा तसेच दिवसातून दोन तीन वेळेस टचस्क्रीन साफ  करण्याची सवय लावून घ्या.5) मोबाईल कव्हर वापराटचस्क्रीन मोबाईल असेल तर अशा मोबाईलला कव्हर लावून वापरा. कारण अनेकांना मोबाईल खिशात ठेवायची सवय असते. खिशात  जर आणखी काही वस्तू असतील जसे की किचन, क्वाईन, त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाईलसोबत फ्लीपकव्हर येतेच, मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाईल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही.6) स्क्रीन गार्ड वापरानवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीन गार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीन गार्ड मुळे टचस्क्रीनचे  लाईफ वाढण्यास मदत होते. हल्ली अनेक महागड्या स्मार्टफोनचे टचस्क्रीन हे स्क्रॅचप्रुफ असतात त्यामुळे त्यांनी स्क्रीनगार्ड नाही वापरले तरी चालते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल