शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

स्मार्टफोन वापरताय ! मग हे वाचाच

By अनिल भापकर | Updated: January 28, 2018 19:57 IST

एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत आहेत. टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा किबोर्डसाठी असायचा.आता टचस्क्रीनमुळे मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.

ठळक मुद्देआपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. टचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो.

आजकाल जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आदीसुद्धा टचस्क्रीनचे यायला लागलेत. टचस्क्रीन मोबाईल हे इतर फिजीकल किबोड मोबाईलपेक्षा वापरायला सोपे आणि  फास्ट असतात. हल्लीच्या विविध डिक्शनरी अ‍ॅपमुळे तसेच मोबाईलच्या आॅपरेटिंग सिस्टीम मध्येसुद्धा असणाऱ्या  डिक्शनरीमुळे टचस्क्रीनचा टायपिंग स्पीड हा जास्त असतो. त्याचप्रमाणे टचस्क्रीनमुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन साईज देखील वाढला आहे. कारण पूर्वी मोबाईलचा खालचा अर्धा भाग हा  किबोर्डसाठी असायचा आता टचस्क्रीनमुळे  मोबाईलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.एकेकाळी टचस्क्रीन मोबाईल नको रे बाबा म्हणणारे देखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाईल आनंदाने वापरताना दिसत  आहेत. अगदी दोन अडीच हजारापासून सुद्धा टचस्क्रीन मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाईल वापरणाऱ्यांची  संख्या ही सर्वाधिक आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.टचस्क्रीनची काय काळजी घ्याल?1) नखाचा वापर करू नका-आपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन  हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.२) हळूच टच  करा-अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाईल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेस स्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो. मात्र ही मंडळी एवढ्या जोरात टचस्क्रीन प्रेस करतात की, त्यामुळे अनेकांचे टचस्क्रीन खराब देखील झाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीनला कधीही जोराने प्रेस करून वापरू नका. अगदी आल्हाद स्पर्श केला तरी टचस्क्रीन काम करतो.३) सूर्यकिरणांचा संपर्क टाळाटचस्क्रीन मोबाईल स्क्रीन जास्तवेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्वीडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शकतो. त्यामुळे चारचाकी मध्ये प्रवास करताना मोबाईल ज्या  दिशेने ऊन येते त्या ठिकाणी  ठेऊ नका.४) छोटा कपडा नेहमी जवळ बाळगाटचस्क्रीन  व्यवस्थित काम करण्यासाठी तो स्वच्छ  असणे गरजेचे असते. धूळ किंवा इतर काही कारणाने टचस्क्रीन अस्वच्छ झाला असल्यास त्याला त्वरित चांगल्या  स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यासाठी मऊ स्वच्छ कपडा  नेहमी जवळ ठेवा तसेच दिवसातून दोन तीन वेळेस टचस्क्रीन साफ  करण्याची सवय लावून घ्या.5) मोबाईल कव्हर वापराटचस्क्रीन मोबाईल असेल तर अशा मोबाईलला कव्हर लावून वापरा. कारण अनेकांना मोबाईल खिशात ठेवायची सवय असते. खिशात  जर आणखी काही वस्तू असतील जसे की किचन, क्वाईन, त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाईलसोबत फ्लीपकव्हर येतेच, मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाईल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही.6) स्क्रीन गार्ड वापरानवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीन गार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीन गार्ड मुळे टचस्क्रीनचे  लाईफ वाढण्यास मदत होते. हल्ली अनेक महागड्या स्मार्टफोनचे टचस्क्रीन हे स्क्रॅचप्रुफ असतात त्यामुळे त्यांनी स्क्रीनगार्ड नाही वापरले तरी चालते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल