शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:31 IST

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे. नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे.स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो. मात्र अनेकदा सतत फोन सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते. नेमका कामाच्या वेळेस फोन चार्ज करता न आल्याने बंद होतो आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण बॅटरीबाबत एक नवीन तंत्रज्ञान हे विकसित करण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे.

नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे. आतापर्यंत लिथियम-आयर्न बॅटरी या स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि पेसमेकरला पॉवर देण्यासाठी वापरल्या जातात. मात्र या जागी रिसर्चर्सनी अल्ट्रा-हाय कॅपिसिटीसाठी लिथियम सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे. स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार आहे. कार एकदा चार्ज केल्यानंतर 1000 किलोमीटरपेक्षा अधिक चालवता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चर्सच्या एका टीमने सल्फर कॅथॉड्सच्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करून यशस्वीरित्या ते सध्या असलेल्या बॅटरी कॉम्बिनेशनच्या जागी वापरले आहे. बॅटरी तंत्रज्ञानाची चाचणी ही या वर्षी कार आणि ग्रिड्समध्ये केली जाणार असल्याची माहिती टीममधील एका सदस्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अँड्रॉईड फोनमध्ये स्क्रीन, डाटा, जीपीएस या तीन गोष्टींवर सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होते. त्यामुळे काही सेटींग्ज बदलल्यावर बॅटरीलाईफमध्ये बर्‍यापैकी फरक जाणवतो.

मोबाईल स्क्रीन 

टचस्क्रीन हे स्मार्टफोनचे अविभाज्य अंग आहे.  बटणांचा कीपॅड असलेले फोन आता फारसे बनतच नाहीत. या स्क्रीनच्या टचसाठी आणि स्क्रिन ब्राईटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी जाते. यावर ब्राईटनेस सेटींग ऑटो मोडवर ठेवली की फोनची बॅटरी जास्त वापरली जाते. त्यापेक्षा मिनीममच्या जवळ पण आपल्या डोळ्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा लेव्हलवर मॅन्युअली फोन  ठेवायचा. जेव्हा आपण अधिक प्रकाशात जातो तेव्हा तो गरज भासल्यास वाढवायचा. थोडं काम वाढेल पण एक्स्ट्रा ब्राईटनेसमुळे जाणारी बॅटरी वाचते.

डाटा

डाटा तर फार महत्त्वाचा. नाही तर फोनचा वापर फक्त बोलण्यापुरता मर्यादित होतो. मात्र आपण कनेक्टेड असतो तेव्हा डाटा देवाणघेवाणीसाठी बॅटरी जातेच. आपण कमी कव्हरेज किंवा कव्हरेज नसलेल्या भागात असतो तेव्हा नेटवर्क शोधण्यासाठीतर जरा जास्तच बॅटरी जाते. त्यामुळे अगदीच गरज नसते तेव्हा मोबाईल नेटवर्क बंद करून टाका. बॅटरी वाचेल.

जीपीएस 

आपल्याला कळतही नाही पण हल्ली जीपीएस सतत ऑन असतं. मात्र सतत ते ऑन असण्याची काहीच गरज नाही. प्रवासात मॅप आणि नेविगेशन वापरतानाच फक्त जीपीएस सुरू केलेलं सर्वात चांगलं. एरव्ही ते बंद ठेवायचं, बॅटरी बचत होते.

 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानcarकार