शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:31 IST

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे. नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे.स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो. मात्र अनेकदा सतत फोन सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते. नेमका कामाच्या वेळेस फोन चार्ज करता न आल्याने बंद होतो आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण बॅटरीबाबत एक नवीन तंत्रज्ञान हे विकसित करण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे.

नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे. आतापर्यंत लिथियम-आयर्न बॅटरी या स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि पेसमेकरला पॉवर देण्यासाठी वापरल्या जातात. मात्र या जागी रिसर्चर्सनी अल्ट्रा-हाय कॅपिसिटीसाठी लिथियम सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे. स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार आहे. कार एकदा चार्ज केल्यानंतर 1000 किलोमीटरपेक्षा अधिक चालवता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चर्सच्या एका टीमने सल्फर कॅथॉड्सच्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करून यशस्वीरित्या ते सध्या असलेल्या बॅटरी कॉम्बिनेशनच्या जागी वापरले आहे. बॅटरी तंत्रज्ञानाची चाचणी ही या वर्षी कार आणि ग्रिड्समध्ये केली जाणार असल्याची माहिती टीममधील एका सदस्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अँड्रॉईड फोनमध्ये स्क्रीन, डाटा, जीपीएस या तीन गोष्टींवर सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होते. त्यामुळे काही सेटींग्ज बदलल्यावर बॅटरीलाईफमध्ये बर्‍यापैकी फरक जाणवतो.

मोबाईल स्क्रीन 

टचस्क्रीन हे स्मार्टफोनचे अविभाज्य अंग आहे.  बटणांचा कीपॅड असलेले फोन आता फारसे बनतच नाहीत. या स्क्रीनच्या टचसाठी आणि स्क्रिन ब्राईटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी जाते. यावर ब्राईटनेस सेटींग ऑटो मोडवर ठेवली की फोनची बॅटरी जास्त वापरली जाते. त्यापेक्षा मिनीममच्या जवळ पण आपल्या डोळ्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा लेव्हलवर मॅन्युअली फोन  ठेवायचा. जेव्हा आपण अधिक प्रकाशात जातो तेव्हा तो गरज भासल्यास वाढवायचा. थोडं काम वाढेल पण एक्स्ट्रा ब्राईटनेसमुळे जाणारी बॅटरी वाचते.

डाटा

डाटा तर फार महत्त्वाचा. नाही तर फोनचा वापर फक्त बोलण्यापुरता मर्यादित होतो. मात्र आपण कनेक्टेड असतो तेव्हा डाटा देवाणघेवाणीसाठी बॅटरी जातेच. आपण कमी कव्हरेज किंवा कव्हरेज नसलेल्या भागात असतो तेव्हा नेटवर्क शोधण्यासाठीतर जरा जास्तच बॅटरी जाते. त्यामुळे अगदीच गरज नसते तेव्हा मोबाईल नेटवर्क बंद करून टाका. बॅटरी वाचेल.

जीपीएस 

आपल्याला कळतही नाही पण हल्ली जीपीएस सतत ऑन असतं. मात्र सतत ते ऑन असण्याची काहीच गरज नाही. प्रवासात मॅप आणि नेविगेशन वापरतानाच फक्त जीपीएस सुरू केलेलं सर्वात चांगलं. एरव्ही ते बंद ठेवायचं, बॅटरी बचत होते.

 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानcarकार