शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

AI क्रांतीत भारताची भरारी; चीनच्या शांघायमध्ये चर्चासत्र, १५ देशांच्या प्रतिनिधींसमोर विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:30 IST

भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रतीक माथुर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात एआय तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात भारताची भूमिका यावर झाली सखोल चर्चा

चीनच्या शांघायमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाने 'जगासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात जगात कृत्रिम तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यात भारताची भूमिका या विषयावर एक महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चा करण्यात आली. शांघाय येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रतीक माथुर यांनी हे खास आयोजन केले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्याला आकार देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतोय, या विषयावर कॉन्सुल जनरल प्रतीक माथुर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. चीनमधील टेक महिंद्राचे रिजनल हेड मुकेश शर्मा हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते. चर्चासत्रात १५ हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या चर्चेत भारताच्या समृद्ध तांत्रिक वारशाबद्दल माहिती देण्यात आली. संस्कृत ग्रंथांपासून ते भारताच्या विविध बोलीभाषेनुसार तयार केलेल्या भाषांचे मॉडेल्स यांच्या विकासापर्यंत सखोल चर्चा करण्यात आली. जबाबदारी ओळखून वागणाऱ्या AI साठी भारताच्या वचनबद्धतेवर मुकेश शर्मा यांनी भर दिला. तसेच, पॅरिस शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी सह-अध्यक्षत्व भूषवणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्याच्या नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात भरभराटीला येणारी स्टार्टअप इकोसिस्टम याबाबतही त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम १९व्या क्रमांकावर आहे. तसेच, सर्वोत्तम स्टार्टअप हब असलेल्या जगभरातील टॉप १० ठिकाणांमध्ये बंगळुरूचा नंबर लागतो. भारताने एआय क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली $3 अब्जची मोठी नवीन गुंतवणूक आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन यावर त्यांनी भाष्य केले. तसेच कृषी, क्लीनटेक, अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवेमध्ये एआय प्रेरित प्रयोगांमधील प्रगती हे महत्त्वाचे टप्पेही त्यांनी अधोरेखित केले.

याव्यतिरिक्त, भाषणात एआयच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास मांडण्यात आला, एजंटिक एआयकडे होणारा बदल, ज्यामुळे मल्टीमोडल सिंगुलॅरिटी आणि शेवटी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. भारत देश धोरणात्मक फायद्यासह एआयचे भविष्य घडवण्यास सज्ज आहे. एआय क्रांतीमध्ये स्वतःला जागतिक नेता म्हणून स्थान देत आहे. जेणेकरून सर्वांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित एआय वातावरण देता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स