शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

AI क्रांतीत भारताची भरारी; चीनच्या शांघायमध्ये चर्चासत्र, १५ देशांच्या प्रतिनिधींसमोर विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:30 IST

भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रतीक माथुर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात एआय तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात भारताची भूमिका यावर झाली सखोल चर्चा

चीनच्या शांघायमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाने 'जगासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात जगात कृत्रिम तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यात भारताची भूमिका या विषयावर एक महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चा करण्यात आली. शांघाय येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रतीक माथुर यांनी हे खास आयोजन केले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्याला आकार देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतोय, या विषयावर कॉन्सुल जनरल प्रतीक माथुर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. चीनमधील टेक महिंद्राचे रिजनल हेड मुकेश शर्मा हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते. चर्चासत्रात १५ हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या चर्चेत भारताच्या समृद्ध तांत्रिक वारशाबद्दल माहिती देण्यात आली. संस्कृत ग्रंथांपासून ते भारताच्या विविध बोलीभाषेनुसार तयार केलेल्या भाषांचे मॉडेल्स यांच्या विकासापर्यंत सखोल चर्चा करण्यात आली. जबाबदारी ओळखून वागणाऱ्या AI साठी भारताच्या वचनबद्धतेवर मुकेश शर्मा यांनी भर दिला. तसेच, पॅरिस शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी सह-अध्यक्षत्व भूषवणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्याच्या नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात भरभराटीला येणारी स्टार्टअप इकोसिस्टम याबाबतही त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम १९व्या क्रमांकावर आहे. तसेच, सर्वोत्तम स्टार्टअप हब असलेल्या जगभरातील टॉप १० ठिकाणांमध्ये बंगळुरूचा नंबर लागतो. भारताने एआय क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली $3 अब्जची मोठी नवीन गुंतवणूक आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन यावर त्यांनी भाष्य केले. तसेच कृषी, क्लीनटेक, अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवेमध्ये एआय प्रेरित प्रयोगांमधील प्रगती हे महत्त्वाचे टप्पेही त्यांनी अधोरेखित केले.

याव्यतिरिक्त, भाषणात एआयच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास मांडण्यात आला, एजंटिक एआयकडे होणारा बदल, ज्यामुळे मल्टीमोडल सिंगुलॅरिटी आणि शेवटी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. भारत देश धोरणात्मक फायद्यासह एआयचे भविष्य घडवण्यास सज्ज आहे. एआय क्रांतीमध्ये स्वतःला जागतिक नेता म्हणून स्थान देत आहे. जेणेकरून सर्वांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित एआय वातावरण देता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स