शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लवकरच लष्करी जवानांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन

By शेखर पाटील | Updated: August 31, 2017 10:31 IST

सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू असणारा वाद पाहता सरकार लवकरच लष्करी जवान तसेच अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन आणि नेटवर्क सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. बहुतांश स्मार्टफोन उत्पादक कंपन्या विदेशी असून त्यांचे माहिती साठवणूक करणारी यंत्रणादेखील (सर्व्हर) विदेशात आहेत. यातच मध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या मोबाइल फोनमधील गुप्त माहिती तसेच त्यांच्या संदेशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यातच बहुतांश लष्करी कर्मचारीदेखील आपापल्या मोबाइल फोनवरूनच इंटरनेटचा वापर करत असतात. या बाबींचा विचार करता त्यांच्यासाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. भारतात लष्करी, निमलष्करी आणि सीमा सुरक्षा बलांचे सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. त्यांना हा विशेषरित्या तयार करण्यात आलेला मोबाइल फोन प्रदान करण्यात येणार आहे. तर त्यांच्यासाठी मोबाइल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपनीदेखील स्वतंत्र असेल. शक्यतो एखादी भारतीय कंपनी यासाठी निवडण्यात येईल. यामुळे संबंधीत कंपनीचे सर्व्हर भारतात असल्यामुळे वेळप्रसंगी गोपनीय माहिती मिळविण्यात काहीही अडचण होणार नाही. तसेच यामुळे विदेशात माहिती जाण्याचा धोकादेखील कमी होऊ शकतो. 

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करtechnologyतंत्रज्ञान