शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिओ, एअरटेलला मागे टाकणार BSNL; सरकारच्या प्लॅनमध्ये टाटा देणार साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:02 IST

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल लवकरच आपले 4G नेटवर्क आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.

BSNL 4G Rollout : बीएसएनएल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकार आता बीएसएनएलसाठी स्वतंत्र गुंतवणुकीचा मार्ग शोधत आहे. यासाठी ६००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीचेही वाटप करण्यात आले आहे. बीएसएनएलकडून 4जी नेटवर्क आणण्यास बराच वेळ लागत असल्याने कंपनीचा ग्राहकवर्गही कमी होत आहे. कमी होत असलेला ग्राहकसंख्या लक्षात घेऊन सरकारने गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे.

सरकारने बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कच्या विस्तारावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं आहे. याअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशभरात बीएसएनएलचे ७५ हजार टॉवर बसवण्याची योजना आहे. या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकार बीएसएनएलला अतिरिक्त ६,००० कोटी रुपये देण्याची योजना आखत आहे. बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कच्या कव्हरेजमध्ये घट झाल्यामुळे कंपनीला ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे दूरसंचार विभाग लवकरच मंत्रिमंडळाकडे या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संपर्क करणार असल्याचे समोर आलं आहे.

जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत 4जी सेवेत मागे पडल्यामुळे बीएसएनएल युजर्स तयार करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. पण बीएसएनएलचा नुकताच प्लॅन समोर आल्यानंतर बीएसएनएलचा यूजर बेस वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी, एक लाख 4जी साइट्सच्या रोलआउटसाठी १९,००० कोटी रुपयांची आगाऊ खरेदी ऑर्डर देण्यात आली होती. पण जेव्हा नेटवर्क विस्तारासाठी वास्तविक खरेदी ऑर्डर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि बीएसएनएलला देण्यात आली तेव्हा त्याची किंमत सुमारे १३,००० कोटी रुपये होती. उर्वरित रक्कम ६००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत, सरकारने २०१९ पासून 4जी सेवांच्या रोलआउटसह पॅकेजचा भाग म्हणून बीएसएनएल आणि एमटीएनलमध्ये सुमारे ३.२२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे बीएसएनएलसाठी उपकरणे तयार केली जात आहेत. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांना १३ हजार कोटी रुपयांची देणी देण्यात आली असून ६ हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहे. मात्र आता सरकार बीएसएनएल पुन्हा एकदा लोकांमध्ये लोकप्रिय  होण्यासाठी योजना आखत आहे.

बीएसएनएल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. बीएसएनएल 5जी देखील लवकरच येत आहे. यामध्ये वेगवान इंटरनेट आणि मजबूत नेटवर्कचा आधार बनवण्यात आला आहे. त्याची चाचणीही सरकारने पूर्ण केली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या नेटवर्कवरून व्हिडिओ कॉल केला आहे. त्यामुळे सरकार देखील युजर्संची संख्या वाढवण्यासाठी मजबूत नेटवर्कवर काम करत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानTataटाटा