शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय 

By सिद्धेश जाधव | Updated: July 31, 2021 14:50 IST

तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे

एक काळ होता जेव्हा लोक अतिरिक्त एसएमएससाठी वेगळा रिचार्ज करत होते. परंतु हल्ली व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम  आणि इतर अनेक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्समुळे लोक एसएमएस अ‍ॅप फक्त ओटीपी बघण्यासाठी वापरत आहेत. आता टेलिकॉम कंपन्या देखील एसएमएसचा वापर अजून कमी होण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहेत.  

भारतातील टेलिकॉम दिग्गज कंपन्या एयरटेल, वोडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जियो आपल्या 100 पेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये मोफत SMS देत नाहीत. म्हणजे या तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत.  

प्रत्येक युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. ज्या लोकांना मोफत एसएमएस बेनिफिट्स हवे असतील असे ग्राहक 100 पेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज पॅक वापरतील आणि कंपन्यांचे उत्पन्न वाढेल. टेलीकॉम कंपन्यांच्या या निर्णयानंतर एंट्री लेव्हल पॅक वापरणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला आहे. मोफत एसएमएस न मिळाल्यामुळे युपीआय व्हेरिफिकेशन, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अश्या अनेक सुविधांच्या फक्त एका मेसेजसाठी ग्राहकांना जास्त खर्च करावा लागले.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया