शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

जि.प. पदाधिकारी सभा टाळू लागले!

By admin | Updated: May 30, 2014 00:41 IST

आचारसंहितेचे कारण: पुणे विभागातील अन्य परिषदा घेतात सभा

सोलापूर : एकीकडे प्रशासन सहकार्य करीत नाही, सहकारी पदाधिकारी हेटाळणी करीत असल्याने राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत जि.प. अध्यक्षा आलेल्या असताना दुसरीकडे आचारसंहितेचे कारण पुढे करुन सर्वसाधारण सभा टाळली जात आहे. विशेष म्हणजे पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांच्या सर्वसाधारण सभा मात्र होत आहेत. जिल्हा परिषदेच्या कारभारावर अध्यक्षाच समाधानी नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने कामे होत नाहीत, कोणत्या विभागाचे काम समाधानकारक आहे ते सांगा?, असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांचा आहे. सहकारी पदाधिकार्‍यांच्या कारभारावरही त्यांनी तोफ डागली. याची खंत राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना वाटली नाही. सर्वसामान्यांचे काम जिल्हा परिषदेत होत नसल्याचे व काही सभापतींकडून साहित्य खरेदीसाठी कशा प्रकारे अडवणूक केली जाते, हेही अध्यक्षा डॉ. माळी यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हा परिषदेचे असे चित्र असताना सदस्यांकडून सभागृहात होणार्‍या हल्ल्याला सामोरे जाण्यापेक्षा सर्वसाधारण सभाच घेण्याचे टाळले जात आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मार्च महिन्यात झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लागलीच पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळेही सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. असे असताना पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांनी मात्र सर्वसाधारण सभा व कामकाज सुरू केले आहे.

-----------------------------------------

पुणे विभागातील सोलापूर वगळता अन्य जिल्हा परिषदांनी आचारसंहिता असली तरी सर्वसाधारण सभा व अन्य सभा घेणे थांबविलेले नाही. सांगली जि.प.ची सर्वसाधारण सभा ९ मे रोजी, पुणे जि.प.ची १३ मे रोजी,कोल्हापूर जि.प.ची २७ मे रोजी झाली असून, सातारा जि.प.ची सर्वसाधारण सभा ११ जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------------------------

पदाधिकार्‍यांना देणे-घेणे नाही ४लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षा डॉ. माळी दोन वेळा दालनात आल्या. उपाध्यक्ष एक दिवस तेही काही वेळेसाठी दालनात आले. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी सभापती एखादा दिवस सोडला तर दालनात आले परंतु बैठका घेतल्या नाहीत. शिक्षण समितीचे सभापतीही एक-दोन वेळा काही वेळेसाठी दालनात बसले. एकत्रित बसून चांगल्या विषयावर चर्चा करावी, शासनाकडे येणार्‍या विषयांचा पाठपुरावा करावा, असे कोणालाही वाटले नाही.

----------------------------

आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत असे सीईओंनी सांगितले. एखाद्या सदस्याने प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर दिल्याने आचारसंहिता भंग होण्याची शक्यता असल्याचे सीईओंनी सांगितल्याने सर्वसाधारण सभा रद्द केली. -डॉ. निशिगंधा माळी अध्यक्षा, जि.प. सोलापूर