शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

जिल्हा परिषद कर्मचारी भरती थांबवली

By admin | Updated: June 18, 2014 00:50 IST

ग्रामविकास खात्याचे आदेश: रिक्त पदांची संख्या वाढणार

 सोलापूर: लोकसभेनंतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निमित्ताने स्थगित केलेली जिल्हा परिषदांच्या कर्मचारी भरतीची कार्यवाही थांबविण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जि.प.च्या जागा वर्षभरासाठी तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाला आहेत. त्यासाठी राज्य शासनाने १७ डिसेंबर २००९ मध्ये वेळापत्रक निश्चित करुन दिले होते. त्यानुसार पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची यावर्षीच्या मे महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाते. या आदेशानुसार रिक्त होणारी सर्व पदे सुरुवातीची काही वर्षे भरण्यात आली. परंतु यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याने रिक्त पदांच्या तीन टक्के पदे भरण्याचे आदेश शासनाने काढले. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या वरचेवर वाढत आहे. रिक्त पदांची संख्या वाढू लागल्याने कामकाजावर कमालीचा परिणाम होऊ लागल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाकडून शासनाकडे गेल्या होत्या. ५ जून २०१४ च्या शासन आदेशान्वये तीन टक्के पद भरतीची कमाल मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी भरती मेऐवजी जुलै महिन्यात करण्याचे वेळापत्रक शासनाने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानंतर राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत कर्मचारी भरतीची जाहिरात द्यावी किंवा कसे, अशी विचारणा जिल्हा परिषदांकडून झाली होती. त्यावर शासनाने भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश सोमवारी (दि.१६ जून) काढण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील आदिवासी क्षेत्राकरिता पद भरतीचे निकष राज्यपालांकडून ९ जून २०१४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे विहित करण्यात आले आहेत. यामुळे पद भरतीचे निकष किमान आदिवासी क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे.---------------------------------आता भरती शक्य आहे का?अगोदर रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे दरवर्षी भरण्याचे आदेश शासनाने काढले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे भरण्याची अट शिथिल केली असली तरी आता पदे भरण्याचा निर्णय थांबविला आहे. जाहिरात देणे, अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व पात्र उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शक्य होणार का?, असा प्रश्न आहे. ------------------------------शासनाच्या आदेशानुसार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पदे भरण्यात येणार नाहीत. जि.प.कडील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणारी पदे आमच्या पातळीवर भरण्यात येतील.-प्रभू जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(प्र)