शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तासंन्‌ तास रांगा लाऊनही लस मिळत नाही.. जाते कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST

एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात जवळपास १२ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १४० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला ...

एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात जवळपास १२ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १४० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी या आकडेवारीशिवाय घरोघरी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण, बाधित रुग्ण, संशयित रुग्णांची संख्या वेगळी आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रशासनाकडून सध्या ४५ वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांना युद्धपातळीवर लसीकरण देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सध्यातरी चित्र आहे. दर दोन दिवसाला पंढरपूर तालुक्यासाठी ३०० पेक्षा अधिक लसीकरणासाठी डोस येत असतात. त्यासाठी लसीकरण केंद्रावर अधिकृत नोंदणी करून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगट असलेले नागरिक रात्री २ ते ३ वाजल्यापासून रांगेत उभे असतात. मात्र सकाळी २०० नागरिकांना लसीकरण केल्यानंतर लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते. ३०० लस येतात ते २०० नागरिकांना दिले जातात आणि प्रशासनाकडून लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते, याचे गौडबंगाल काय, १०० लसींचे डोस कुठे जातात, असा सवाल नागिरकांमधून होऊ लागला ओह.

काही दिवसांपासून पंढरपुरातील काही लसीकरण केंद्रांवरील लस नगरसेवकांनी पळविल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. मात्र त्यानंतरही यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सरकार वयोवृद्ध नागरिकांना खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम अवलंबत आहे. मात्र काही मंडळी आपल्या जवळच्या व्यक्तींनाच लस देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

----

नेमक्या लसी जातात कुठे?

पंढरपुरातील नागरिक अभय उत्पात यांच्या आई अधिकृत नोंदणी करून लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांचा नंबर येण्याअगोदरच लस संपल्याचे जाहीर केले जाते. यावर त्यांनी रजिस्ट्रेशन न केलेल्या लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला आहे. दुसऱ्या एका नागरिकाने ६५ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला. त्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ते नागरिक लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १४० वा. नंबर होता असे सांगितले. त्या केंद्रावर २५० लस उपलब्ध होत्या. रात्री २ वाजल्यापासून ते तब्बल ६ ते ८ तास रांगेत होते. मात्र त्यांना लस मिळाली नाही. अवघ्या अर्ध्या तासात २५० लसींचा साठा गेला कुठे, अशी अनेक उदाहरणे दररोज समोर येत आहेत.

-----

लस तुटवडा संदर्भातील तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. ते थांबविण्यासाठी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी वेगळे केंद्र, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र व ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी वेगळे केंद्र आणि सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळी सोय केल्यास गर्दी, गोंधळ होणार नाही. यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर