शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तासंन्‌ तास रांगा लाऊनही लस मिळत नाही.. जाते कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST

एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात जवळपास १२ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १४० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला ...

एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात जवळपास १२ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १४० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी या आकडेवारीशिवाय घरोघरी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण, बाधित रुग्ण, संशयित रुग्णांची संख्या वेगळी आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रशासनाकडून सध्या ४५ वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांना युद्धपातळीवर लसीकरण देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सध्यातरी चित्र आहे. दर दोन दिवसाला पंढरपूर तालुक्यासाठी ३०० पेक्षा अधिक लसीकरणासाठी डोस येत असतात. त्यासाठी लसीकरण केंद्रावर अधिकृत नोंदणी करून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगट असलेले नागरिक रात्री २ ते ३ वाजल्यापासून रांगेत उभे असतात. मात्र सकाळी २०० नागरिकांना लसीकरण केल्यानंतर लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते. ३०० लस येतात ते २०० नागरिकांना दिले जातात आणि प्रशासनाकडून लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते, याचे गौडबंगाल काय, १०० लसींचे डोस कुठे जातात, असा सवाल नागिरकांमधून होऊ लागला ओह.

काही दिवसांपासून पंढरपुरातील काही लसीकरण केंद्रांवरील लस नगरसेवकांनी पळविल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. मात्र त्यानंतरही यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सरकार वयोवृद्ध नागरिकांना खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम अवलंबत आहे. मात्र काही मंडळी आपल्या जवळच्या व्यक्तींनाच लस देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

----

नेमक्या लसी जातात कुठे?

पंढरपुरातील नागरिक अभय उत्पात यांच्या आई अधिकृत नोंदणी करून लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांचा नंबर येण्याअगोदरच लस संपल्याचे जाहीर केले जाते. यावर त्यांनी रजिस्ट्रेशन न केलेल्या लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला आहे. दुसऱ्या एका नागरिकाने ६५ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला. त्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ते नागरिक लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १४० वा. नंबर होता असे सांगितले. त्या केंद्रावर २५० लस उपलब्ध होत्या. रात्री २ वाजल्यापासून ते तब्बल ६ ते ८ तास रांगेत होते. मात्र त्यांना लस मिळाली नाही. अवघ्या अर्ध्या तासात २५० लसींचा साठा गेला कुठे, अशी अनेक उदाहरणे दररोज समोर येत आहेत.

-----

लस तुटवडा संदर्भातील तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. ते थांबविण्यासाठी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी वेगळे केंद्र, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र व ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी वेगळे केंद्र आणि सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळी सोय केल्यास गर्दी, गोंधळ होणार नाही. यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर