शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

याचि देही याचि डोळा, असा अनुभवला पालखी सोहळा

By admin | Updated: June 26, 2015 00:06 IST

अकोलेकर भाविकांनी केले पालखीचे हर्षोल्हासात स्वागत

कोल्हापूर : मटक्याच्या गुन्ह्यांच्या तपासावरून सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत बापूसाहेब खाडे यांच्यासह तिघा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिल्याने कोल्हापूर पोलीस दलात गुरुवारी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांचे मूळ गाव अंबप (ता. हातकणंगले) आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदली करता येत नाही. तरीही त्यांची रत्नागिरीहून कोल्हापुरात बदली करण्यात आली होती. त्यांना शहरातील संवेदनशील असणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. पदभार स्वीकारून सहा महिनेही पूर्ण झाले नसताना त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला बदली झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सवात मिरवणुकीदरम्यान त्यांच्याच हद्दीतील मंगळवार पेठ व शिवाजी पेठेतील मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी लावले होते. त्यामुळे वादावादी होऊन मिरवणूक रेंगाळली होती. त्यातच आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्याची प्रक्रिया याच पोलीस ठाण्यातून झाली होती. त्यामुळे या बदलीमागे याचेही कारण असण्याची शक्यता त्या दरम्यान चर्चिली जात होती. सोलापूर येथे १७ जूनला मटक्याच्या कारवाईवरून सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी व उपनिरीक्षक गंगाधर जोगधनकर यांच्यात हाणामारी झाली होती. हा वाद खाडे यांच्या अंगलट आला आहे. यामध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे कोल्हापूर पोलीस दलात चर्चा रंगली आहे.(प्रतिनिधी)