शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के

By रवींद्र देशमुख | Updated: April 20, 2023 18:44 IST

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता.

सोलापूर : पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत राज्यात सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून चालूवर्षी बेसुमार पाणी सोडल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरण एक महिन्या अगोदर मायनसमध्ये जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणी प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ७ ऑक्टोबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरसाठी वेळोवेळी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा सात महिन्यांत ५३ टीएमसीने कमी झाला आहे. मागील वर्षी उजनी धरण ८ जूनपासून मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ते आठ जुलै रोजी १२.७७ टक्के मायनस झाले होते. मात्र, चालू वर्षी दि.२० एप्रिल रोजी धरणात १२.५३ टक्के उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या सीनामाढा उपसा योजना, दहिगाव योजना, बोगदा व मुख्य कालवा यातून ४,१३३ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. तसेच बॅक वॉटरमधूनही शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यातच सध्या सूर्य आग ओकत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा पाऊण टक्क्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मायनसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

उपयुक्त जलसाठा केवळ १२.९१ टक्केचमागील वर्षी दि. २० एप्रिल रोजी उजनी धरणात ४५.३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता तो चालू वर्षी मात्र, १२.९१ टक्के एवढाच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उपयुक्तसाठा ३३ टक्के कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीररूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.