शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के

By रवींद्र देशमुख | Updated: April 20, 2023 18:44 IST

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता.

सोलापूर : पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत राज्यात सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून चालूवर्षी बेसुमार पाणी सोडल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरण एक महिन्या अगोदर मायनसमध्ये जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणी प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ७ ऑक्टोबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरसाठी वेळोवेळी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा सात महिन्यांत ५३ टीएमसीने कमी झाला आहे. मागील वर्षी उजनी धरण ८ जूनपासून मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ते आठ जुलै रोजी १२.७७ टक्के मायनस झाले होते. मात्र, चालू वर्षी दि.२० एप्रिल रोजी धरणात १२.५३ टक्के उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या सीनामाढा उपसा योजना, दहिगाव योजना, बोगदा व मुख्य कालवा यातून ४,१३३ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. तसेच बॅक वॉटरमधूनही शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यातच सध्या सूर्य आग ओकत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा पाऊण टक्क्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मायनसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

उपयुक्त जलसाठा केवळ १२.९१ टक्केचमागील वर्षी दि. २० एप्रिल रोजी उजनी धरणात ४५.३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता तो चालू वर्षी मात्र, १२.९१ टक्के एवढाच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उपयुक्तसाठा ३३ टक्के कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीररूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.