शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के

By रवींद्र देशमुख | Updated: April 20, 2023 18:44 IST

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता.

सोलापूर : पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत राज्यात सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून चालूवर्षी बेसुमार पाणी सोडल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरण एक महिन्या अगोदर मायनसमध्ये जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणी प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ७ ऑक्टोबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरसाठी वेळोवेळी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा सात महिन्यांत ५३ टीएमसीने कमी झाला आहे. मागील वर्षी उजनी धरण ८ जूनपासून मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ते आठ जुलै रोजी १२.७७ टक्के मायनस झाले होते. मात्र, चालू वर्षी दि.२० एप्रिल रोजी धरणात १२.५३ टक्के उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या सीनामाढा उपसा योजना, दहिगाव योजना, बोगदा व मुख्य कालवा यातून ४,१३३ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. तसेच बॅक वॉटरमधूनही शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यातच सध्या सूर्य आग ओकत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा पाऊण टक्क्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मायनसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

उपयुक्त जलसाठा केवळ १२.९१ टक्केचमागील वर्षी दि. २० एप्रिल रोजी उजनी धरणात ४५.३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता तो चालू वर्षी मात्र, १२.९१ टक्के एवढाच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उपयुक्तसाठा ३३ टक्के कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीररूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.