शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अर्धी लढाई जिंकली पुढच्या लढय़ासाठी तयारी सुरू - मेटे

By admin | Updated: June 30, 2014 13:47 IST

मराठा समाजाने अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आरक्षण मिळाले. मात्र तुटपुंज्या फायद्यावर आम्ही समाधानी नाही असे प्रतिपादन विनायक मेटेंनी केले आहे.

सोलापूर : मराठा समाजाने अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आरक्षण मिळाले. मात्र तुटपुंज्या फायद्यावर आम्ही समाधानी नाही. पुढच्या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी रविवारी सोलापुरात केले.

आघाडी सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आ. मेटे यांनी स्वागत केले. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याने या आरक्षणाचा फारसा लाभ होणार नसल्याने नाराजी व्यक्त केली. मराठा समाजासाठी नवा आठवा प्रवर्ग निर्माण करणे चुकीचे असून आघाडी सरकारमधील चार-पाच मंत्र्यांच्या दबावामुळे ओबीसीमध्ये समावेश होऊ शकला नाही, असा थेट आरोप केला. खुद्द नारायण राणे यांनी मराठा समाजाला २0 टक्के आरक्षण देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली शिफारस श्रेयवादातून डावलण्यात आल्याचा गौप्यस्फोट आ. मेटे यांनी केला.
राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजाची लोकसंख्या ३५ टक्के आहे. शिवसंग्रामने २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. राणे समितीने अहवालात २0 टक्क्यांची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र आठ टक्क्यांवर बोळवण करायचे ठरविले होते. अखेर १६ टक्क्यांचा निर्णय झाला. दिलेले आरक्षण तोकडे तर आहेच पण कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राच्या सूचित एससी, एसटी आणि ओबीसी असे तीनच प्रवर्ग असल्याने राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचा केंद्रीय शाळांमधील प्रवेश, नोकर्‍यांसाठी लाभ होणार नसल्याची खंतही मेटे यांनी व्यक्त केली. केंद्राची शिष्यवृत्ती तसेच अन्य सवलती मिळणार नसतील तर या आरक्षणाचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला.
केतन तिरोडकर यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. शिवसंग्राम संपूर्ण शक्तिनिशी या न्यायालयीन लढय़ासाठी सरकारच्या पाठीशी राहील किंबहुना शिवसंग्राम संघटनेला प्रतिवादी करावे यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाचा आदेश बाहेर पडण्यापूर्वी केवळ बातमीवर दाखल केलेली याचिका टिकणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
------------
राजकीय पक्षासाठी प्रस्ताव
शिवसंग्राम संघटनेने आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात काम केले. विधानसभा लढण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केला असून ३0 जुलैपर्यंत संघटना पक्ष म्हणून अस्तित्वात येईल, असेही मेटे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली भाजपा, सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम यांची महायुती विधानसभा निवडणुकीतही अभेद्य राहील. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महायुतीच्या जागावाटपात बिघाडी होईल, हा भ्रम आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून घालविण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, दास शेळके उपस्थित होते.