शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तुकड्या-तुकड्यांनी एफआरपी देण्यास विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST

ऊस गाळपासाठी गेल्यानंतर एकरकमी वाजवी व किफायतशीर(एफआरपी) ऊस बिलाची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सध्या कायद्याने ...

ऊस गाळपासाठी गेल्यानंतर एकरकमी वाजवी व किफायतशीर(एफआरपी) ऊस बिलाची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सध्या कायद्याने बंधन आहे. शेतकरी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारची सातत्याने संघर्ष करून ऊस नियंत्रण कायदा करून घेतला होता. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिल हमखास मिळणार याची काहीअंशी शाश्वती होती. अलीकडच्या काळात साखरेच्या बाजार भावात चढ-उतार होत असल्याने कारखानदार या कायद्याचे पालन करीत नाहीत. मात्र, शेतकऱ्यांना हा कायदा आधार वाटत होता. आता त्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आता एकत्र येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी असा बदल घडल्यास कडाडून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रचलित कायदा बदलून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कावर घाला घालण्याचे कारस्थान केंद्र सरकार आणि निती आयोग करीत असेल तर कारखानदारांना पाठीशी घालण्यासाठी अशी भूमिका घेतली जात आहे. हा आरोपही त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांनी तुकड्या-तुकड्यात एफआरपी देण्याच्या निर्णयाविरोधात एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

-------

कायदा असूनही गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी मिळत नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखानदारावर कारवाई होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आजही अडचणीतच आहेत. या कायद्यात बदल केल्यास शेतकऱ्यांच्या नशिबी वनवासच येणार. पुन्हा एकदा आंदोलन हाच पर्याय.

- उमाशंकर पाटील सचिव,

स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा

--------

शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा तुडविण्याची नीती आयोगाची आणि केंद्र सरकारची नीती स्पष्ट दिसते. प्रचलित कायद्याची नीटपणे अंमलबजावणी करण्यात अपयश आले आता नवीन कायदा करून कारखानदारांना खुश करण्याचा सरकारचा डाव दिसतो. एफआरपी एकरकमीच हवी. त्यात बदल नको. साखरेवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा हवा. त्यांची रक्कम आधी दिल्यानंतर बँकांची देणी देणारा कायदा करा.

-

प्रभाकर ऊर्फ भैया देशमुख, संस्थापक

जनहित शेतकरी संघटना

---------

कारखाना वेळेवर उसाची बिले देत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. एकरकमी एफआरपी दिली तरच त्यांना बँकांची देणी, खते, बी- बियाणे खरेदी करणे शक्य आहे. त्यात तुकडे पाडले तर रक्कम त्यांच्या हाताला लागणार नाही. कारखानदार शेतकऱ्यांचे हित न पाहता धंदा म्हणून पाहतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता सरकारवर आहे.

-

शिवानंद पाटील, शेतकरी, कुडल

----