शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

तुकड्या-तुकड्यांनी एफआरपी देण्यास विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST

ऊस गाळपासाठी गेल्यानंतर एकरकमी वाजवी व किफायतशीर(एफआरपी) ऊस बिलाची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सध्या कायद्याने ...

ऊस गाळपासाठी गेल्यानंतर एकरकमी वाजवी व किफायतशीर(एफआरपी) ऊस बिलाची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सध्या कायद्याने बंधन आहे. शेतकरी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारची सातत्याने संघर्ष करून ऊस नियंत्रण कायदा करून घेतला होता. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिल हमखास मिळणार याची काहीअंशी शाश्वती होती. अलीकडच्या काळात साखरेच्या बाजार भावात चढ-उतार होत असल्याने कारखानदार या कायद्याचे पालन करीत नाहीत. मात्र, शेतकऱ्यांना हा कायदा आधार वाटत होता. आता त्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आता एकत्र येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी असा बदल घडल्यास कडाडून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रचलित कायदा बदलून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कावर घाला घालण्याचे कारस्थान केंद्र सरकार आणि निती आयोग करीत असेल तर कारखानदारांना पाठीशी घालण्यासाठी अशी भूमिका घेतली जात आहे. हा आरोपही त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांनी तुकड्या-तुकड्यात एफआरपी देण्याच्या निर्णयाविरोधात एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

-------

कायदा असूनही गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी मिळत नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखानदारावर कारवाई होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आजही अडचणीतच आहेत. या कायद्यात बदल केल्यास शेतकऱ्यांच्या नशिबी वनवासच येणार. पुन्हा एकदा आंदोलन हाच पर्याय.

- उमाशंकर पाटील सचिव,

स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा

--------

शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा तुडविण्याची नीती आयोगाची आणि केंद्र सरकारची नीती स्पष्ट दिसते. प्रचलित कायद्याची नीटपणे अंमलबजावणी करण्यात अपयश आले आता नवीन कायदा करून कारखानदारांना खुश करण्याचा सरकारचा डाव दिसतो. एफआरपी एकरकमीच हवी. त्यात बदल नको. साखरेवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा हवा. त्यांची रक्कम आधी दिल्यानंतर बँकांची देणी देणारा कायदा करा.

-

प्रभाकर ऊर्फ भैया देशमुख, संस्थापक

जनहित शेतकरी संघटना

---------

कारखाना वेळेवर उसाची बिले देत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. एकरकमी एफआरपी दिली तरच त्यांना बँकांची देणी, खते, बी- बियाणे खरेदी करणे शक्य आहे. त्यात तुकडे पाडले तर रक्कम त्यांच्या हाताला लागणार नाही. कारखानदार शेतकऱ्यांचे हित न पाहता धंदा म्हणून पाहतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता सरकारवर आहे.

-

शिवानंद पाटील, शेतकरी, कुडल

----