शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST

कुर्डूवाडी : ऐन उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा माणसांंपेक्षाही मुक्या पशुपक्ष्यांना व वन्यजीवांना ...

कुर्डूवाडी : ऐन उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा माणसांंपेक्षाही मुक्या पशुपक्ष्यांना व वन्यजीवांना होत आहे. त्यामुळे या काळात त्यांंना खाद्यान्न बरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. याची जाणीव वनपरिक्षेत्र कार्यालयाला यंदा लवकर झाल्याने माढा तालुक्यातील अनेक गावच्या जंगलातील पाणवठ्यांमध्ये सध्या त्यांच्या वन कर्मचाऱ्यांकडून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, जंगलात हिरवा चारा उन्हाळ्यात उपलब्ध नसल्याने त्यातील काही वन्यप्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत.

माढा तालुक्यात भुताष्टे,भेंड,पडसाळी,उपळाई(बू), बादलेवाडी, तुळशी, दहिवली, उपळवाटे, परिते, पडसाळी, बावी, वडाचीवाडी यासह अनेक गावांमध्ये वनपरिक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वनपरिक्षेत्रांमध्ये हरीण, काळवीट,ससा, मुंगूस यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर कोल्हा, लांडगा, खोकड, मोर, माळटिटवी, टिटवी असे विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने या पशुपक्ष्यांना तसेच वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच हिरवा चारा देखील उपलब्ध होत नसल्याने हे मानवी वस्तीमध्ये येतात.

--

१२ हजार लिटर पाणीसाठा उपलब्ध

वन्य जीवांना तसेच पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दर पंधरा दिवसाला सुमारे १२ हजार लिटर पाणी तालुक्यातील विविध ठिकाणच्या जंगलात तयार करण्यात आलेल्या सुमारे १९ पाणवठ्यांमध्ये वनविभागाच्यावतीने सोडण्यात येत आहे. आता सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या वन्य जीवांसाठी पाणवठ्याच्या ठिकाणी त्यांंना खाण्यासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

....................

०६ कुर्डुवाडी

दहिवली येथे वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाकडून जंगलातील पाणवठ्यात पाणी सोडताना वन विभागाचे कर्मचारी